शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मका खरेदी केंद्राला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे. शेतकºयांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : मका उघड्यावर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे रोजगार नसल्याने आधीच शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली आहे. मकापीक निघाले व कसेबसे तालुक्यात एकमेव केंद्र सुरू झाले. मका विकून आलेल्या पैशात कोरोनाचे संकट पेलवू असे स्वप्न रंगवत असतानाच बारदाना व गोदामात जागा नाही म्हणून खरेदी बंद झाली. खरेदी केंद्रावर मका उघड्यावर पडून आहे. दररोज सायंकाळी ढग दाटून पावसाची रिपरिप सुरू होते. कोरोना संकटाचा सामना कसा करावा या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली व पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही. खा. प्रफुल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यानंतर तालुक्यात एकमेव खरेदी केंद्र सुरू झाले. त्याला प्रशासनाच्या व खरेदी केंद्रावरील संचालक मंडळाच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीची दृष्ट लागली व हे केंद्र अल्पावधीतच बंद पडले.पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे.शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. विश्वास ठेवून शेतकरी ते करतात. मात्र पीक हातात आल्यानंतर विक्रीसाठी किती यातना भोगाव्या लागतात हे दुखणे ऐकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कुणीतरी फिरकतो असे आठवत नाही. याऐवजी धानपिक घेतले असते तर आतापर्यंत चुकारे घेऊन नक्की झाले असते असे शेतकºयांचे म्हणणे आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सुमारे ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. अजूनही बराच मका उघड्यावर आहे. यावर्षी मान्सून वेळेवर झाला व प्रशासनाचे असेच भिजत घोंगडे राहिल्यास शेतकऱ्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.याउलट विचार केला तर पीक बदल शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. मात्र यासाठी प्रशासनाने खंबीरपणे शेतकºयांच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे आजच्या स्थितीतून दिसून येत आहे.बारदाना व गोदामाची बाधा आहे. वाहतुकीचे नियोजन झाले आहे. उद्या-परवा हा प्रश्न निकाली निघेल. बारदाना कंटेनर केंद्र शासनाकडून येतो. सोमवारी सायंकाळ पर्यंत येणार होतं. येताच पुरवठा करू. त्यानंतर पूर्ववत खरेदी सुरू होईल. या क्षेत्रात पहिल्यांदाच मका लागवड झाली. सुमारे १५ हजार क्विंटल खरेदी होईल. खरेदी पहिल्यांदाच होत असल्याने अडचण येत आहे. या अडचणी पुढच्या खरेदी वेळी येणार नाहीत. शेतकºयांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.-राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ कार्यालय नवेगावबांध

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड