शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:02 IST

जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर पुन्हा संकट : मोका चौकशी करून मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे धानासह रबी पिकाला चांगलाच फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. भंडारा शहरात सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली.पवनी : मागील काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्याचे दर्शन झाले नाही. पवनी शहरात पाऊस बरसला नाही. धानाची मळणी काहींची झाली, काहींची व्हायला आहे. अशा वातावरणात रब्बी हंगामातील पिकावर अळी पडते असा शेतकऱ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला अशी पीकं घेतली जातात. अशा सर्व पिकांचे अळी पडल्याने नुकसान होत असते. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्गाला चिंता सतावत आहे.साकोली : मागील दोन तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून कडाक्याची थंडी आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस आला. याचा फरक आज आठवडी बाजारावर पडला आहे. शेतात कठाण माल असून या पावसाचा तेवढा परिणाम पडला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे नक्कीच फरक पडणार आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकºयांचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. जर जोराचा पाऊस आला तर धान नसविण्याची होण्याची शक्यता आहे.जवाहरनगर : सतत तीन दिवसापासून जवाहरनगर व इतर परिसरात ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शनही झाले नाही. आज सकाळी ८.३० वाजता सुमारापासून ११ वाजतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे शेतावर कापलेले धान पिकास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालांदूर : दहा दिवसांपासून ढगाळ हवामानाने मानवी जीवनासह बागायती कडधान्याची शेती प्रभावित झाली आहे. रविवार सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आले. मोठा पाऊस येणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. मात्र परिसरात तुतळक पावसाची हजेरी लागली. तुळीच्या शेंगा पोखरणारे पोषक हवामान असल्याने तूर पीकाचे नुकसान झाले आहे. उघड्यावर धान खरेदी केंद्रावर धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मिळेल ती साधने वापरीत धान झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मोठा पाऊस आल्याशिवाय आभाळ खुलणार नाही, असे जाणकारांचे म्हणने आहे.

टॅग्स :Rainपाऊस