शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:02 IST

जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर पुन्हा संकट : मोका चौकशी करून मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे धानासह रबी पिकाला चांगलाच फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. भंडारा शहरात सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली.पवनी : मागील काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्याचे दर्शन झाले नाही. पवनी शहरात पाऊस बरसला नाही. धानाची मळणी काहींची झाली, काहींची व्हायला आहे. अशा वातावरणात रब्बी हंगामातील पिकावर अळी पडते असा शेतकऱ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला अशी पीकं घेतली जातात. अशा सर्व पिकांचे अळी पडल्याने नुकसान होत असते. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्गाला चिंता सतावत आहे.साकोली : मागील दोन तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून कडाक्याची थंडी आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस आला. याचा फरक आज आठवडी बाजारावर पडला आहे. शेतात कठाण माल असून या पावसाचा तेवढा परिणाम पडला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे नक्कीच फरक पडणार आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकºयांचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. जर जोराचा पाऊस आला तर धान नसविण्याची होण्याची शक्यता आहे.जवाहरनगर : सतत तीन दिवसापासून जवाहरनगर व इतर परिसरात ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शनही झाले नाही. आज सकाळी ८.३० वाजता सुमारापासून ११ वाजतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे शेतावर कापलेले धान पिकास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालांदूर : दहा दिवसांपासून ढगाळ हवामानाने मानवी जीवनासह बागायती कडधान्याची शेती प्रभावित झाली आहे. रविवार सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आले. मोठा पाऊस येणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. मात्र परिसरात तुतळक पावसाची हजेरी लागली. तुळीच्या शेंगा पोखरणारे पोषक हवामान असल्याने तूर पीकाचे नुकसान झाले आहे. उघड्यावर धान खरेदी केंद्रावर धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मिळेल ती साधने वापरीत धान झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मोठा पाऊस आल्याशिवाय आभाळ खुलणार नाही, असे जाणकारांचे म्हणने आहे.

टॅग्स :Rainपाऊस