शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:20 PM

करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देधानपीक हातचे गेले : मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले. त्यातच १६ तासाचे भारनियमन, कीड व रोगांचे आक्रमण, जंगल परिसरात वन्यजीवांचा हौदोस यासर्व कारणांमुळे शेतकरी वैतागला आहे. आता दुष्काळाचे सर्व्हेक्षण करण्यास शासनाने पुढाकार घेतला असला तरी मागील अनेक अनुभवाप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळणार काय, असा प्रश्न आहे.करडी परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहाडी तालुक्यातील पांजरा, मोहगाव देवी व आंधळगाव येथील धान पिकाची पाहणी केली. परंतु दुष्काळाचा फटका बसलेल्या करडी परिसराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या पाहणीत त्यांनी धान उत्पादक शेतकºयांच्या शेतीचा सविस्तर सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकºयांना लाभ मिळाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्ष काय लाभ दिला जाणार, याकडेही शेतकºयांचे लक्ष लागून आहेत.टेलवरील शेती दुर्देवीयावर्षी रिसाळा जलाशयात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेही सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यातच पाणी वितरणातील प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळेही टेलवर पाणी पोहचले नाही. करडी परिसरात कोरडा दुष्काळ पडला. धान गर्भावस्थेत असताना व अधिक सिंचनाची गरज असताना भारनियमनाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले. भेगा पडलेल्या शेतीला आठ तासात सिंचनाच्या सुविधा देताना धावपळ झाली. वारंवार खंडीत होणारे भारनियमन यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत त्यानाही पिकाला पाणी देता आले नाही. शेतकºयांवर आपत्तीची कुऱ्हाडच कोसळली.