शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:07 AM

सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे.

ठळक मुद्देपाऊस मुबलक बरसेना : बाजारपेठेतील उलाढाल असमाधानकारक, उत्साह कमी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे. बैलांचा साज घ्यायलाही पैसा नसल्याने सणाच्या तोंडावरही बाजारात समाधानकारक उलाढाल झालेली नाही.बळीराजाचा खरा मित्र अशी ओळख म्हणून सण पोळा हा साजरा केला जातो. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात बैलांच्या पोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सततची नापिकी व पावसाची पाठ या दोन बाबींमुळे पोळा सणावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसुन येत आहे. याउपरही जीएसटीमुळे बैलांचा साज घेणाºया साहित्यांमध्ये वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत आहे. सण साजरा करायचाच पण पैशाविना कसा असा प्रश्न तो स्वत:लाच विचारित आहे.जिल्ह्यात बºयाच ठिकाणी मोठा पोळा भरविला जातो. मात्र पुर्वीपेक्षा बैल जोड्यांची संख्या कमी झाल्याने पोळा भरणाºया ठिकाणी मनोरंजनात्मक साहित्य जास्त व बैल जोड्यांची संख्या कमी असे दृष्य दिसून येत आहे.बैलांचा साज महागलामागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत उलाढाल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बैलांचा साज घेण्यात येणाºया साहित्यांमध्ये येसण ५० रुपये जोडी, चौरंग ४० रुपये जोडी, बैलांचा ढुल १३५० ते २००० रुपये जोडी, मटाटी ४० रुपये जोडी, माला १०० रुपये जोडी, पेंट ३० रुपये (५० ग्रॅम), रंग-बेगड १० रुपये, गोप ५ रुपये, कासरा १०० रुपये जोडी, मोरखी १०० रुपये जोडी या भावाने साहित्य मिळत आहेत. हेच साहित्य मागील वर्षी कमी दरात उपलब्ध होते. अपेक्षेनुरुप पाऊस न बरसल्याने शेतात पेरलेले धान्यही उगवले नाही. कुठे उगवले तर रोवणीसाठी पाणी नाही. अशा दुविधा स्थितीत सापडलेल्या बळीराजासमोर आर्थिक चणचण असतांना पोळा सण साजरा तरी कसा करावा असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतही समाधानकारक उलाढाल होत नसल्याची प्रतिक्रिया बैलांचा साज विकणारे शब्बीर खान यांनी दिली. पोळा सण असतानाही या व्यवसायात घट दिसून आल्याचीही म्हणण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीदारांची संख्या कमी आहे. दुसरीकडे बैलजोड्यांची संख्याही घटत असल्याने ही समस्या वाढली आहे. पैशाअभावी बैलांच्या सजावटीकरिता लागणाºया खरेदीबाबतही शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी राजकारण बाजूला सोडून सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची व शासन दरबारी व्यथा मांडण्याची शक्यता आहे. अधिकाºयानीही उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार न करता नियोजन व प्रत्यक्ष चौकशीचे निर्देश देण्याची आवश्यकता आहे. करीडी परिसरात मंगळवारला काही कालावधीसाठी दमदार पाऊस झाला असला तरी पावसाचे पाणी शेतीला पडलेल्या भेगांमध्ये जिरले आहे.उमेश तुमसरे शेतकरी पालोरा