ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:46 IST2018-07-27T00:44:44+5:302018-07-27T00:46:57+5:30

भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

The dream of the Eton-Kolari Bridge will be realized | ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

ठळक मुद्देप्रशासकीय मान्यता : सेतू निर्माण कृती समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु) : भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचे स्वप्न साकार होत असल्याने या परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कछ देना सीखे’ या समर्पित भावनेने सदर पुलाची गरज लक्षात घेवून ईटान कोलारी सेतु निर्माण कृति समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी या पुलाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेवून हे आव्हान स्विाकरले. त्यांनी कृती समितीमार्फत शासन, प्रशासन आणि भाजप संघटनेकडे दमदार पाठपुरावा केला. परिणामी या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली.
सुमारे ४० वर्षापुर्वी किटाडी-विरली (बु) या जिल्हामार्गाचे बांधकाम करण्यात आले. त्याचवेळी भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाºया ईटान-कोलारी पुल बांधकामासाठी सर्वेक्षण झाले होते. कालांतराने हा प्रस्ताव मागे पडला. याच संधीचा गैरफायदा घेवून जिल्ह्यातील एका वजनदार लोकप्रतिनिधींनी हा पूल अन्यत्र हलविण्याचा डाव आखला. याविषयी परिसरात कुणकुण लागताच नि:स्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेल्या उध्दव कोरे यांनी याविरुध्द लढण्यासाठी कंबर कसली.
सर्वप्रथम त्यांनी राजेश महावाडे या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांना हा पुल ईटान -कोलारी दरम्यानच होणे कसे सर्वांच्या सोयीचे आहे, हे पटवून दिले. या सर्व मान्यवरांची बैठक घेवून हा पुल अन्यत्र हलविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी ईटान - कोलारी सेतु निर्माण कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर पुलासाठी पाठपुरावा करुन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देण्याची ठरविण्यात आले. या समितीमध्ये अध्यक्ष वामन बेदरे, निमंत्रक अनिल मेंढे, संयोजक राजेंद्र फुलबांधे, संपर्क प्रमुख उध्दव कोरे, तर सदस्य म्हणून कृष्णाजी शहारे, प्रदिप बुराडे, संजय गजपुरे, वामन तलमले, चंदाबाई राऊत, दयावंती शिलार, अशोक प्रधान, डॉ. वासुदेव विधाते, मेघेश्याम वैद्य, शंकर हुमने, विश्वपाल हजारे, अशोक पारधी, गजानन ठाकरे आणि हरिशचंद्र भाजीपाले यांचा समावेश आहे.
या समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी परिश्रम करुन ईटान-कोलारी आणि अन्य ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व इतर बारकाव्याचा अभ्यास करुन ईटान-कोलारी येथेच पूल उभारणे कसे सोयीचे आहे ? हे अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना पटवून दिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, तत्कालनी खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, आ. डॉ. परिणय फुके, आ. बाळा काशिवार, आ. बंटी भागडीया आणि अनेक मंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहार करुन व भेटी घेवून पाठपुरावा केला.
लुप्त झालेल्या कार्यकर्ता संस्कृतीसाठी प्रेरणावाट
सध्या विविध पक्षांमध्ये कार्यकर्ता संस्कृती लुप्त होत चालली असून कंत्राटदार संस्कृती उदयास येत आहे. अशा परिस्थितीत उध्दव कोरे यांच्यासारखा कार्यकर्त्याने नेटाने लढा देवून या परिसरातील जनतेसाठी वरदान ठरणाºया पुलाचा प्रश्न समितीच्या माध्यमातून मार्गी लावला. हे विविध पक्षातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: The dream of the Eton-Kolari Bridge will be realized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.