शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

विद्यार्थ्यांना भातच खाऊ घालायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:23 IST

अनेक शाळांमधील तांदूळ व तेल, तिखट, मीठ असा धान्यादी साठा संपला आहे. संघटनांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनातर्फे तांदळाचा साठा शाळेत पोहचता करीत आहे.

ठळक मुद्देधान्यादी माल पुरवा : मुख्याध्यापक म्हणतात, अन्यथा पोषण आहार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अनेक शाळांमधील तांदूळ व तेल, तिखट, मीठ असा धान्यादी साठा संपला आहे. संघटनांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनातर्फे तांदळाचा साठा शाळेत पोहचता करीत आहे. तथापि, शालेय पोषण आहारात केवळ भातच विद्यार्थ्यांना खाऊ घालायचा काय असा सवाल मुख्याध्यापकांनी विचारला आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करावा, या मुख्य मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांच्यामार्फत देण्यात आले.मोहाडी तालुक्याच्यावतीने जिल्हा परिषद व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शालेय पोषण आहाराच्या अडचणी बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन सादर केले. अनेक शाळांमधील तांदळाचा साठा संपला आहे. त्यामुळे उसणवार तांदूळ घेण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही शाळांना उसणवार धान्य मिळत नसल्याने शाळांमधील मुलांवर ताट्या वाजविण्याची वेळ आली आहे.धान्यादी मालाची खरेदी केली त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना अजुनही बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे हे मुख्याध्यापक आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत २०१७-१८ नवीन पुरवठाधारक अजुनही निश्चित केला गेला नाही. २०१६-१७ या वर्षासाठा केलेल्या करारनाम्याची मुदत १४ जून व १६ जून २०१७ रोजी संपुष्टात आली आहे.तथापि, जिल्हास्तरावरून पुरवठादारांकडून तांदूळ पुरविण्याची कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले आहेत, असे असले तरी वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याने भातही कसे शिजवायचे असा प्रश्न शाळांना पडला आहे. मुख्याध्यापक संघटनांनी विषय रेटला त्यामुळे धान्याचा पुरवठा केला जात आहे. तथापि, धान्यादी मालाची खरेदीची तात्पुरती कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. सप्टेंबर २०१७ ला पंचायत समिती सभागृहात शालेय पोषण अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांनी १५ दिवसानंतर सुरळीत होईल. धान्यादी साहित्याची मुख्याध्यापकांनी खरेदी करावी. १५ दिवसात खरेदीचे बिले देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, तीन महिने होऊनही बिलाची रक्कम मिळाली नाही. शासनस्तरावर धान्यादी मालाचा पुरठादार नेमता आला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा की शालेय पोषण आहारासाठी साहित्य खरेदी करण्यावर पगार खर्च करायचा असा पेच मुख्याध्यापकांना पडला आहे. माहे जुलै ते माहे नोव्हेंबर २०१७ चे इंधन खर्चाचे बिल देण्यात यावे, स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन दरमहा जमा करण्यात यावे, शाळांना गॅस कनेक्शन देऊन गॅस सिलिंडर द्यावे, बाजारभावाप्रमाणे भाजीपाला व पुरक आहार खर्च देण्यात यावा, या मागण्यांची पुर्तता ३० नोव्हेंबरपर्यंत करावी, असा इशारा मोहाडी तालुक्यातील मुख्याध्यापकांनी दिली आहे.अन्यथा १ डिसेंबरपासून मोहाडी तालुक्यातील खाजगी व जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविला जाणार नाही, अशा इशारा मुख्याध्यापक गोपाल बुरडे, राजकुमार बांते, दयालनाथ माळवे, प्रकाश करणकोटे, हिंमत तायडे, मार्तंड कापगते, कमला चौधरी, यशोदा येळणे, ओमप्रकाश चोले, राजू भोयर, हेमराज दहिवले, नंदलाल बिल्लोरे, सिंधू गहाणे, दिगांबर राठोड, उमेश पडोळे, वसंत मारवाडे, वसंत मारवाडे, गणराज बिसेन, करचंददास साखरे, एकनाथ उपरीकर, विनोद नवदेवे आदींनी दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी