शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जिल्ह्यात २० हजार क्विंटल बियाण्यांची टंचाई जाणवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:09 IST

खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.

ठळक मुद्देखरीप हंगाम : मागणी ४४ हजार क्विंटल, बियाणे मिळाले २४ हजार क्विंटल

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामुळे २० हजार ८२० बियाणांचा अद्यापही तुटवडा निर्माण झाला आहे.भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पºहे करपून तर काहींची रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली. भंडारा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतांनाही प्रशासनाने दुष्काळातून बाद केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. गतवर्षीची भर रब्बी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा प्रयत्न वातावरण बदलामुळे फसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. यात खरीप भात एक लाख ८० हजार हेक्टर, तुर १२ हजार १०० हेक्टर व सोयाबीन ५५० हेक्टर आहे. यावर्षी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. यात भात पिकासाठी ४३ हजार ७३९ क्विंटल, तूर ८६५ क्विंटल व सोयाबीन ३५० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. मात्र आजपर्यंत तूर ३४०, सोयाबीन १५०, तर भात २३ हजार ७६१, असे एकूण २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यावर्षी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी अधिकाºयांचे म्हणणे आहे.तसेच रासायनीक खतांसाठी ८६ हजार १०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यात युरिया ३८ हजार ७४० मे. टन, डीएपी १० हजार ६३० मे. टन, एसएसपी ११ हजार ३१०, एमओपी २ हजार ९८० व इतर संयुक्त खते २३ हजार ४४० मेट्रीक टनचा समावेश आहे. यापैकी आजपर्यंत ३७ हजार ७३४ मेट्रीक टन रासायनीक खतांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९८ हजार २६० सभासदांना ४१४ कोटी ५० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. मात्र अद्यापही बहुतांश शेतकरी कर्जापासून वंचित असल्याचे दिसून येते. याला कारणीभूत बँकेचे अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश देत असले तरी दुसरीकडे मात्र बँकेचे अधिकारी कर्ज वाटपात टाळाटाळ करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गतवर्षी ६९ हजार ४२४ शेतकºयांना ३२४ कोटी ७६ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, हे विशेष.शेतकऱ्यांना आता पावसाचे वेधनवतपा ५ जून रोजी संपला आहे. मात्र अद्यापही उन्हाच्या झळा कायम आहे. शेतकरी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. धुरे पेटविणे, काडीकचरा गोळा करणे, शेतात असलेली तणस सुरक्षीत ठेवणे, शेतात शेणखत घालण्याचे काम वेगात सुरु आहे. अनेकांची ही कामे आटोपली असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.भरारी पथक सक्रियखरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशकांतून शेतकऱ्यांची फसगत होवू नये, यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथक तयार केले असून कृषी केंद्राची कसून तपासणी करीत आहे. दोषी केंद्र संचालकांविरुध्द कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तक्रार निवारणासाठी दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी