शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

बेला ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:32 IST

तालुक्यातील बेला या गावाने जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्यांदाच घोषित झालेल्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजनेत बेला ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला

जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा : ४० लाखांचा मिळाला निधी, स्वच्छता अभियानातही मारली बाजी

भंडारा : तालुक्यातील बेला या गावाने जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्यांदाच घोषित झालेल्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजनेत बेला ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यात महाराष्ट्र दिनी झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या हस्ते बेला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यानी हा पुरस्कार स्वीकारला.४० लक्ष रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विशेष म्हणजे स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारही बेला या गावाने पटकाविला आहे. यात १० लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. या आशयाची माहिती सरपंच शारदा गायधने यांनी मंगळवारी बेला ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी उपसरपंच अर्चना कांबळे, ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपूरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी उपस्थित होते. सरपंच गायधने यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर पहिल्यांदाच बेला ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजनेत सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींची स्मार्ट ग्राम योजना जिल्हास्तरीय तपासणी चमूने पाहणी केली असता त्यामध्ये भंडारा तालुक्यातील बेला ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक आला. या शिवाय बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. कॅशलेस व्यवहार, शोष खड््यांचे बांधकाम, बायोमॅट्रीक मशीन, १ ते ३३ प्रकारचे नमुने, चावडीचे बांधकाम, शंभरटक्के कर वसुली, एलईडी पथदिवे, ग्रामपंचायतीचे सौंदर्यीकरण, रेनवॉटर हार्वेस्टींग, कम्पोस्ट खत प्रकल्प, पाणीपुरवठा योजनेंअतर्गत शुध्द पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र वेबसाईट आदी नाविण्यपुर्ण उपक्रमही राबविण्यात आल्याची माहितीही सरपंच गायधने यांनी दिली. याशिवाय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत प्रथम पुरस्कार संयुक्तरित्या मिळाला आहे. बेला ग्रामपंचायतीने एकूण पाच पुरस्कार प्राप्त केले आहे. या यशामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय गाढवे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे, भिमगिरी बोदेले, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कन्हैया नागपूरे, पोलीस पाटील श्रीराम भिवगडे, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.महाराष्ट्रदिनी आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. सावंत, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार स्विकारतांना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शारदा गायधने व उपसरपंच अर्चना कांबळे, ग्राम विकास अधिकारी नागपूरे, ग्रा.प. सदस्य रजनी बाभरे, हीरा ताई निंबार्ते, कुंदा शेंडे, अनिता खवस, कविता इमले, धनराज घरडे, रमेश लुटे, पराग वघरे, गणेश ठवकर, भुपेंद्र रामटेके, गोपीचंद गाढवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)