शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

अन्‌ जिल्हाधिकारी दुचाकीने पोहोचले पूरबाधीत ‘आवळी’ गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातन डोग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहत असतात. यासंबंधाने परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली.

ठळक मुद्देमान्सून पुर्व उपाय योजनांवर केली चर्चा : समस्या घेतल्या जाणून

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वैनगंगा व चुलबंद नदीच्या वेढ्यात वसलेल्या आवळी गावात पावसाळ्यात निर्माण होणारी  पूरपरिस्थिती व विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यानी दुचाकीने आवळी गावात जाऊन विविध समस्यांवर नागरिकांशी चर्चा केली. शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आवळी गावात जिल्हाधिकारी चक्क दुचाकीने आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही बसला.तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातन डोग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहत असतात. यासंबंधाने परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावालगतच्या वैनगंगा नदी पात्रासह गावातील प्राथमिक शाळा, पाणीपुरवठा योजना यासह अन्य शासन सुविधांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. दरम्यान, पूरपरिस्थितीत या गावातील शेतपिकांच्या हानीबद्दल देखील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी  नागरिकांना पावसाळ्यात निर्माण पूरपरिस्थिती व पुनर्वसन संबंधाने विचारणा केली. असता शासनाकडून   विविध मागन्यांची पूर्तता न झाल्याने पुनर्वसन खोळंबल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सोनी व आवळी गावाच्या मधोमध असलेल्या चूलबंद नदीतून पायी जात दुचाकीने प्रवास करून आवळीवासीयांची भेट व चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार मनोहर कोरेटी, सहायक ठाणेदार विरसेन चहान्दे, बिडिओ प्रमोद वानखेडे, विस्तार अधिकारी गडमडे, ग्रामसेवक लांजेवार, तलाठी मेश्राम, कौरवार  पोलीस पाटील, सरपंच  होमराज  ठाकरे,  शहारे  गुरुजी यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

पुनर्वसित गावात जाण्यास तयार नाहीत ५० वर्षांपूर्वी या गावाचे तालुक्यातील इंदोरा येथे शासनाने पुनर्वसन करताना शेत जमिनीसह भूखंडदेखील उपलब्ध केले आहे. मात्र उपलब्ध करण्यात आलेली शेतजमीन पीक घेण्यायोग्य नसल्याने या गावातील नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून जमिनीची सुधारणा करून देण्याची मागणी केली आहे. मात्र शासनाकडून सदर जमिनीच्या सुधारणा विषयक कोणत्याच उपाययोजना न करण्यात आल्याने या गावातील नागरिक पुनर्वसित गावात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी