शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना मोफत अन्नधान्यांचे वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : 'लोकमत' ई- पेपर आवृत्तीतून होत असलेल्या जनजागृतीचे कौतुक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): संपूर्ण जग भयभीत झालेल्या कोरोनावर उपाययोजनेसाठी आमदार निधीचा उपयोग तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात करणार आहे. विविध उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच लेखी पत्र दिले जाईल. याशिवाय स्वखर्चातून क्षेत्रातील अत्यंत गरीब परिवारांना तांदूळ, गहू, तेल व कडधान्यांचे वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणा आमदार राजू कारेमोरे यांनी पालोरा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका बैठकीत केली.क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या. अडचणींवर मंथन करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पालोरा येथील आठवडी बाजाराला भेट देत व्यावसायिक व ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या. सर्वांनी सामाजिक अंतर ठेवून तसेच पाणी व साबणाने हात घेऊन कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा दिला. यावेळी लोकमत ई- पेपर आवृत्तीचे वाचन करून 'लोकमत'ने घेतलेल्या लोक जागृतीच्या संकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.बैठकीला आमदार राजू कारेमोरे, सरपंच महादेव बुरडे, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, ठाणेदार निलेश वाजे, अमरकंठ लांडगे, सुखदेव मुरकुटे, प्रकाश भोयर, धान खरेदी केंद्राचे ग्रेडर रहांगडाले, डॉ. अभय शेंडे, ग्रामपंचायत सदस्य रोशन कडव, भोजराम तिजारे, मनीषा बुरडे, रवींद्र ठवकर, भैया कनोजकर व ग्रामस्थ उपस्थित होते.राजू कारेमोरे म्हणाले, सध्या कोरोनावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे काळजी घेणे, शासन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. संचार बंदीच्या काळात कोणत्याही सुविधाविणा नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणांपासून नागरिक रस्त्याने पायी गावांकडे परत जातांना दिसत आहेत. त्यांनी सावधानता बाळगून सर्वांना मदतीचे आवाहन केले. त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून स्वत: होम क्वारटाईनमध्ये रहावे. कोरोनाचा प्रसार बघता गाफील राहून चालणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक