पोटगी देऊनही न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना
By Admin | Updated: June 11, 2014 23:12 IST2014-06-11T23:12:56+5:302014-06-11T23:12:56+5:30
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलेला कुटुंबियांकडून मारहाण केल्याची राजश्री वाहने यांची तक्रार खोटी आहे. खोटे आरोप लावून आई, मावशी व माझ्यासह कुटुंबियांविरुद्ध खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा

पोटगी देऊनही न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना
भंडारा : कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलेला कुटुंबियांकडून मारहाण केल्याची राजश्री वाहने यांची तक्रार खोटी आहे. खोटे आरोप लावून आई, मावशी व माझ्यासह कुटुंबियांविरुद्ध खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा प्रयत्न आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे सहकार्य घेऊन धमकावण्याचा प्रकार असल्याची तक्रार संदीप वाहाणे यांनी केली आहे.
संदीप व राजश्री यांचा प्रेमविवाह २०१२ मध्ये झाला होता. पत्नीच्या संशयी वृत्तीमुळे नेहमी भांडण व्हायचे. छोट्याशा कारणावरुन होणाऱ्या प्रकरणात राजश्रीने मला व माझ्या कुटुंबियांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. कौटुंबिक हिंसाचार २००५ व महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रथा २०१३ नुसार खोट्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे व संशय वृत्तीमुळे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. माहिती समुपदेशन केंद्रात झालेल्या समोपदेश प्रक्रियेत दोघांनी एकत्र ठेवणे धोक्याचे आहे असे सांगितले. त्यानंतर ते २२ मे २०१३ पासून वेगळे राहत आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दरमहा २००० रुपये व नागपूर येथे भाड्याने घर करुन दिले आहे. त्यानुसार तिने तिथे न राहता ५ एप्रिल २०१४ रोजी संदीप वाहाने यांची आई पौर्णिमा वाहने यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आई व मावशी यांना त्रास देऊन त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी पोलिसात दिल्या. सदर घर आईचे असून त्यात असलेले सर्व साहित्य तिच्या मालकीचे आहे. आईला घरात बळजबरीने प्रवेश करुन त्रास देत असल्यामुळे ६ मे २०१४ रोजी तिच्या जाचाला कंटाळून आई व मावशीने घर सोडले. घर सोडल्यानंतर त्यांचे सामान जुन्या घरी असल्यामुळे आईने ३१ मे २०१४ रोजी सामान आणण्याकरीता गेल्यावर शुभांगीने भांडण करुन खोट्या तक्रारी केल्या.
भंडारा व नागपूर येथील गुंडांनी गावातील जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके यांना धमकाविले. शेजारी राहत असलेले माझे मावशी यांच्याघरी जाऊन मारण्याची धमकी दिली. यावरुन ते सर्व गुंड मला व माझ्या कुटुंबियांना संपवण्याच्या बेतात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठे जीवित हानीचे प्रकरण टळले. या प्रकरणात दोषीवर कारवाई करण्याची मागणी संदीप वाहने यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)