लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शाळा सुरू होणार असे तुणतुणे वाजवले जात आहेत. शाळा सुरू होण्याची संभाव्य वेळ जवळ येऊन ठेपली आहे. शाळा निर्जंतुकीकरण करण्याचे सांगितले जात आहे. मात्र या शाळा निर्जंतुकीकरण कोणत्या खर्चाने व कुणी करायच्या याबद्दल स्पष्टता नाही. या खर्चाचा भार आपत्ती व्यवस्थापनाने करून तातडीने निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता निर्जंतुकीकरणाचा भार कुणी उचलायचा असा संभ्रम आहे. तालुक्यातील एका गावच्या शाळेचा वापर करण्यात आला होता. आता निर्जंतुकीकरणाचा प्रश्न आहे. शालेय व्यवस्थापनाने ग्रामपंचायतकडे विचारणा केली. त्यांनी निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या रसायनाचा पुरवठा करण्याची हमी दिली. मात्र यासाठी लागणारा मनुष्यबळ व यंत्राची जबाबदारी शाळेवरच घातली.शाळा हा खर्च कुठून करणार हा प्रश्न आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाबद्दल सुरुवातीपासूनच अनिभज्ञता आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना अनेक विभागात हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यासाठी आलेला निधी जिरविण्यात आला. शहरात व काही ग्रामीण भागात तर ब्लिचिंगची फवारणी केल्याचे प्रकार घडलेत. याकडे कुणीही लक्ष घातले नाही. त्यामुळे फवारणीसाठी आवश्यक असलेले रसायन व फवारणीचे साहित्य प्रशासनाने पुरविले पाहिजे.शाळा निर्जंतुकीकरण कराबाहेरून आलेल्या लोकांच्या विलगीकरणासाठी शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालयांचा वापर करण्यात आला.शाळा, महाविद्यालये ही कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतात असे प्रशासनाच्या वक्तव्यांवरून दिसून येते.अशा वेळेपूर्वी निर्जंतुकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकाडे कोरोनावर मात करण्यासाठी मोठा निधी असतो. या निधीतून प्रशासनाने वापरलेल्या शासकीय व खासगी इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे मत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.
निर्जंतुकीकरणाचा खर्च आपत्ती व्यवस्थापनाने करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता निर्जंतुकीकरणाचा भार कुणी उचलायचा असा संभ्रम आहे. तालुक्यातील एका गावच्या शाळेचा वापर करण्यात आला होता.
निर्जंतुकीकरणाचा खर्च आपत्ती व्यवस्थापनाने करावा
ठळक मुद्देशाळा सुरू होणार की नाही संभ्रमावस्था : विषयाने पालकही चिंतेत