शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका

By admin | Updated: October 6, 2014 23:08 IST

विधानसभेसाठी होणारे मतदानाला दहा दिवस शिल्लक आहेत. परंतु, तुमसर विधानसभा क्षेत्रातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे अद्याप अस्पष्ट आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढा उत्साह नाही.

वरठी : विधानसभेसाठी होणारे मतदानाला दहा दिवस शिल्लक आहेत. परंतु, तुमसर विधानसभा क्षेत्रातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे अद्याप अस्पष्ट आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढा उत्साह नाही. यावेळी राजयोग घेऊन मैदानात उतरलेल्या पक्षांना येथील मतदार जाब विचाण्याच्या तयारीत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसणार आहे. भाजपमध्ये विद्यमान उमेदवार विजयी झाल्यास तो सर्वांना फिरवणार याची धुसफूस सुरू आहे. माजी आमदार अनिल बावनकर यांची भुमिका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत या क्षेत्रात राष्ट्रीय पक्षाच्या विरोध वाढत आहे. भाजपचे चरण वाघमारे यांनी मोठा विरोध झुगारून तर काँग्रेसचे प्रमोद तितीरमारे यांनी विद्यमान आमदारांची तिकीट कापून उमेदवारी मिळविली. भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ हाताला बांधली. किसान गर्जनाचे राजेंद्र पटले यांचे पक्षातील स्थान अनेक दिवसापासून अस्थिर होते. हो नाही म्हणत त्यांनी शिवधनुष्य उचलले आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार हे सर्वपरीचित व राजकीय क्षेत्रातून आले आहेत. पक्षाची उमेदवारी एकाला मिळाल्यामुळे अन्य दावेदार नाराज होतात. निवडणुकानंतर वरिष्ठ नेते पुढाकार घेऊन मनोमिलन घडवून आणतात. परंतु, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षात मनोमिलन घडण्याचे दिसत नाही. भाजपचे उमेदवार चरण वाघमारे यांच्या विरोधात भाजपचा मोठा गट होता. गटागटाच्या प्रक्रियेत सर्व गट मधुकर कुकडे यांना उमेदवारी मिळाल्यास काम करण्यासाठी तयार होते. परंतु चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे एकाकी पडल्याचे दिसते. एकहाती कारभार चालवतात व इतरांना डावलतात, असा भाजपातीलच कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर आरोप आहे. आता ते विजयी झाले तर सहजासहजी मैदान सोडणार नाही. पुढील काळात इतरांना संधी मिळणार नाही, यासाठी भाजपचा मोठा गट त्यांच्या विरोधात आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तितीरमारे यांना वडिलोपार्जीत राजकीय वारसा मिळाला असला तरी तो वारसा अनुकूल नाही. २००९ च्या निवडणुकीत ऐनवेळेवर बावनकरांनी त्यांची तिकीट कापली होती. यावेळी त्यांनीही तेच केले. परंतु यावेळी बावनकर यांचे प्रस्थ असल्यामुळे मोहाडी व तुमसर तालुक्यात त्यांचा गट सक्रीय आहे. तितीरमारे यांची तुमसर शहराबाहेर फारशी ओळख नाही. बावनकर यांच्या भूमिकेवर त्यांची मदार आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात पक्षात वजनदार नेते नाही. पक्षात मोठे असलेल्या नेत्यांचा जनाधार नाही, अशी परिस्थिती आहे. कुकडे हे तीनदा आमदार राहिल्यानंतर मागील निवडणुकीत बावनकर निवडून आले. यावेळीही पुन्हा अपेक्षा केली, पक्षाने तिकीट कापली. त्यांना राष्ट्रवादी आठवली. फिटवण्यासाठी उमेदवारी दिली, अशी चर्चा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या रॅलीत उडी घेतली. शिवसेनेचे राजेंद्र पटले यांच्या समांतर संघटनेमुळे कार्यकर्त्यांची फळी नाही. किसान गर्जना नंतर भाजप व आता शिवसेना यामुळे त्यांना मतदाराचा कौल किती मिळणार हे सांगता येत नाही. सध्या ते एकटेच गावागावात फिरत आहेत. युतीच्या काळात शिवसेनेची ताकद दिसली नव्हती. सध्याच्या राजकीय समीकरणात तुमसर विधानसभा क्षेत्रात कोण बाजी मारणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. जातीय समीकरणाच्या आधारावर मतांचे विभाजन होणार असले तरी लोकसभा निवडणुकीची लाट निष्प्रभ ठरण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)