लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे असलेल्या गट क्रमांक ११ मधील तलावातील मुरुमाच्या मोठ्या प्रमाणात उपशामुळे तलावाचे विद्रूपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे सदर प्रकार दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही यावर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई झालेली नाही.मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे. सदर कार्य करणाऱ्यांना कशाचीच भीती उरली नसल्याचेही यावरून दिसून येत आहे. परिणामी याबाबत पर्यावरण प्रेमींनीही नाराजगी व्यक्त केली आहे. तलावातून मुरुम उपसा केल्यानंतर त्याची वाहतूक करण्याकरिता रस्ता बनविण्यात आला आहे. मनमर्जीने उत्खनन सुरु असून परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याचीही ओरड ग्रामस्थांमध्ये आहे. याप्रकारामुळे प्रशासनाचा लक्षावधी रुपयाचा महसूलही बुडत असल्याचे सांगण्यात येते.लाखोंचा महसूल पाण्यातपरवानगीपेक्षा जास्त मुरुमाचे खनन होत असल्याने मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे. महसूल प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
मुरुम खननाने तलावाचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST
मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे. सदर कार्य करणाऱ्यांना कशाचीच भीती उरली नसल्याचेही यावरून दिसून येत आहे.
मुरुम खननाने तलावाचे विद्रुपीकरण
ठळक मुद्देमेंगापूर येथील प्रकार : महसूल विभागाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा होतोय ऱ्हास