शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

संक्रमक विषाणूंमुळे वाढताहेत आजार

By admin | Updated: October 20, 2014 23:07 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

भंडारा : बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू विषाणुंच्या संक्रमणाने होत असल्याचे दिसते. डास, पाणी, अन्नातूनही प्रसारभारतात होणाऱ्या संक्रामक आजारांमध्ये ९0 टक्के लोकांना अँन्टीबायोटिक्सची गरज नसते. मात्र, गोळ्या घेतल्याशिवाय बरे वाटत नसल्याची मानसिकता निर्माण झाल्याने आपण जबरदस्तीने औषधांचे सेवन करीत राहतो. आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्म जीवांचा प्रसार जलदगतीने आणि थेट होतो. कधी-कधी थेट संक्रमण न होता डास, पाणी, अन्न यामाध्यमातूनही प्रसार होतो. याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. जिवाणूंचे संक्रमण झाल्याचे लक्षात येताच डॉक्टारांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. औषधांचा अयोग्य वापरशारीरिक किंवा मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी सवर्सामान्यपणे औषधांचा वापर केला जातो. औषधांमुळे जसा रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे अनेक नवीन आजार उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक औषधेसंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. लस किंवा प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधी नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जिवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशाप्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. मधुमेहासारखे विकारसंक्रमण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता असते. काही औषधीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिमिर्तीवर बरेवाईट प्रभाव पाडू शकतात. प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते. (प्रतिनिधी)