प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित
By Admin | Updated: June 24, 2015 01:12 IST2015-06-24T01:12:32+5:302015-06-24T01:12:32+5:30
जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले.

प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित
जवाहरनगर : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. शानाने त्यांना पॅकेज जाहीर केले. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले अशा खैरी येथील गावठाण बाहेरील ६० घरांना अजूनही कोणत्याही प्रकारचे मोबदला, पॅकेज मिळाले नाही.
याकडे गोसेखुर्द विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांमध्ये शासन व प्रशासनाविरोधात असंतोष आहे. खैरी सालेबर्डी येथील गावठाण भुसंपादन प्रकरणात प्रकल्पग्रस्तांची घरे संपादित करण्यात आले. संबंधित विभागाने या गावाला गावठत्तणातील घरांना मुळ मोबदला व पॅकेज रक्कम देण्यात आली. परंतु येथील गावठाणाबाहेरील ते ६० कुटूंबे अजूनही मोबदला व पॅकेज रक्कम मिळण्याची प्रतिक्षा संबंधित विभागाकडे करीत आहे.
खैरी या गावचे पुनर्वसन अशोकनगर फुलमोगरा या नियोजित स्थळी युद्धपातळीवर सुरू आहे. काही कुटूंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली आहे. सदर येथील ६० घरांना सुद्धा भुखंड, पट्टे सुद्धा मिळाली आहेत. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० घरांचा मोबदला व पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. सदर घरे मोडकळीस आले आहे.
दरवर्षी घरांची दुरूस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटूंबे मोडक्या घरात वास्तव्य करीत आहे. संबंधित विभाग व प्रशासनाने विरोधात प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोसीखुर्द विभागाने या ६० कुटूंबाना मोबदला पॅकेज लवकरात लवकर देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (वार्ताहर)