शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिव्यांगांना मिळणार स्वतंत्र शिधापत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST

राज्यातील बहुसंख्य दिव्यांग बेरोजगार आहेत, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका ...

राज्यातील बहुसंख्य दिव्यांग बेरोजगार आहेत, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधावाटप कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्याअनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तत्काळ देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अधिनियम २०१३ नुसार राज्यात ७००.१६ लक्ष लाभार्थीसंख्या निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटांत विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांना व बीपीएल गटातील सर्व लाभार्थ्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आले होते.

शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेला अन्नधान्याचा लाभ जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात व त्यांची नावे त्याच शिधापत्रिकेत नमूद असूनदेखील पात्र दिव्यांग व्यक्ती अन्नधान्य मिळण्यापासूून वंचित राहत होत्या. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना धान्य मिळावे, यासाठी दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.