शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील घरे : ग्रामपंचायती पुढाकार घेणार काय?

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने जीर्ण घराचे भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरला गावात जीर्ण घराची भींत अपघाताला आमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे.ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे. माती आणि कवेलूचे असणारी घरे गावकऱ्यांच्या जीवावर बेतणारी झाली आहे. सिहोरा परिसरातील गावात असे चित्र प्रत्येक गावात असल्याचे दिसून येत आहेत.दरवर्षी पावसाचे पाण्यामुळे भींती जीर्ण झाली आहेत. या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही. या घरांशेजारी गावातील बालके खेळताना दिसून येत आहे. काही गावात जीर्ण भिंती कोसळल्याने बालकांचा बळी गेला आहे. परंतु गावात जीर्ण घराचे भिंती भुईसपाट करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत या गंभीर समस्येवर विचारमंथन करण्यात आले नाही. गावातील महत्वपूर्ण सभेत सदर विषय चर्चेत घेण्यात येत नाही. यामुळे गावात अशा जिवघेण्या घरांच्या भिंती उभ्या आहेत. घरमालक कधी गावात परतत नाही. घटनेची जबाबदारी स्विकारत नाही. यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी सर्वेक्षणानुसार आधी नोटीस देवून सूचना देण्याची आवश्यकता आहे. जीर्ण घर आणि भिंतीच्या समस्यावर शहरात नगरपालिकामार्फत कारवाई तथा सूचना देण्यात येत आहे. परंतु अशी जागरूकता गावात दिसून येत नाही.जीर्ण भिंतीवरून ग्रामपंचायत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. राज्यमार्गावरील डोंगरला गावात तुमसर येथील जायस्वाल नामक घर खरेदी केले आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असणाºया या घराची भिंत जीर्ण झाली आहे. याच घराचे शेजारी लहान मुळे खेळत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. भिंतीला भेगा पडल्या असल्याने वर्दळीच्या मार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात जीर्ण आणि ओसाड भिंती उभ्या आहेत. या भिंती लहान बालकांच्या जीवावर बेतणाºया आहेत. डोंगरलातील घरांची भिंत धोकादायक असल्याने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.-शंकर राऊत, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, तुमसर.

टॅग्स :Rainपाऊस