शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील घरे : ग्रामपंचायती पुढाकार घेणार काय?

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने जीर्ण घराचे भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरला गावात जीर्ण घराची भींत अपघाताला आमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे.ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे. माती आणि कवेलूचे असणारी घरे गावकऱ्यांच्या जीवावर बेतणारी झाली आहे. सिहोरा परिसरातील गावात असे चित्र प्रत्येक गावात असल्याचे दिसून येत आहेत.दरवर्षी पावसाचे पाण्यामुळे भींती जीर्ण झाली आहेत. या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही. या घरांशेजारी गावातील बालके खेळताना दिसून येत आहे. काही गावात जीर्ण भिंती कोसळल्याने बालकांचा बळी गेला आहे. परंतु गावात जीर्ण घराचे भिंती भुईसपाट करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत या गंभीर समस्येवर विचारमंथन करण्यात आले नाही. गावातील महत्वपूर्ण सभेत सदर विषय चर्चेत घेण्यात येत नाही. यामुळे गावात अशा जिवघेण्या घरांच्या भिंती उभ्या आहेत. घरमालक कधी गावात परतत नाही. घटनेची जबाबदारी स्विकारत नाही. यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी सर्वेक्षणानुसार आधी नोटीस देवून सूचना देण्याची आवश्यकता आहे. जीर्ण घर आणि भिंतीच्या समस्यावर शहरात नगरपालिकामार्फत कारवाई तथा सूचना देण्यात येत आहे. परंतु अशी जागरूकता गावात दिसून येत नाही.जीर्ण भिंतीवरून ग्रामपंचायत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. राज्यमार्गावरील डोंगरला गावात तुमसर येथील जायस्वाल नामक घर खरेदी केले आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असणाºया या घराची भिंत जीर्ण झाली आहे. याच घराचे शेजारी लहान मुळे खेळत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. भिंतीला भेगा पडल्या असल्याने वर्दळीच्या मार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात जीर्ण आणि ओसाड भिंती उभ्या आहेत. या भिंती लहान बालकांच्या जीवावर बेतणाºया आहेत. डोंगरलातील घरांची भिंत धोकादायक असल्याने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.-शंकर राऊत, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, तुमसर.

टॅग्स :Rainपाऊस