शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील घरे : ग्रामपंचायती पुढाकार घेणार काय?

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने जीर्ण घराचे भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरला गावात जीर्ण घराची भींत अपघाताला आमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे.ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे. माती आणि कवेलूचे असणारी घरे गावकऱ्यांच्या जीवावर बेतणारी झाली आहे. सिहोरा परिसरातील गावात असे चित्र प्रत्येक गावात असल्याचे दिसून येत आहेत.दरवर्षी पावसाचे पाण्यामुळे भींती जीर्ण झाली आहेत. या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही. या घरांशेजारी गावातील बालके खेळताना दिसून येत आहे. काही गावात जीर्ण भिंती कोसळल्याने बालकांचा बळी गेला आहे. परंतु गावात जीर्ण घराचे भिंती भुईसपाट करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत या गंभीर समस्येवर विचारमंथन करण्यात आले नाही. गावातील महत्वपूर्ण सभेत सदर विषय चर्चेत घेण्यात येत नाही. यामुळे गावात अशा जिवघेण्या घरांच्या भिंती उभ्या आहेत. घरमालक कधी गावात परतत नाही. घटनेची जबाबदारी स्विकारत नाही. यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी सर्वेक्षणानुसार आधी नोटीस देवून सूचना देण्याची आवश्यकता आहे. जीर्ण घर आणि भिंतीच्या समस्यावर शहरात नगरपालिकामार्फत कारवाई तथा सूचना देण्यात येत आहे. परंतु अशी जागरूकता गावात दिसून येत नाही.जीर्ण भिंतीवरून ग्रामपंचायत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. राज्यमार्गावरील डोंगरला गावात तुमसर येथील जायस्वाल नामक घर खरेदी केले आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असणाºया या घराची भिंत जीर्ण झाली आहे. याच घराचे शेजारी लहान मुळे खेळत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. भिंतीला भेगा पडल्या असल्याने वर्दळीच्या मार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात जीर्ण आणि ओसाड भिंती उभ्या आहेत. या भिंती लहान बालकांच्या जीवावर बेतणाºया आहेत. डोंगरलातील घरांची भिंत धोकादायक असल्याने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.-शंकर राऊत, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, तुमसर.

टॅग्स :Rainपाऊस