शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाने घेतली दखल : भंडाराचा तांदूळ मिळणार थेट राज्यभरातील ग्राहकांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतात राबून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकरी देवानंद चौधरी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.विकेल ते पिकेल अभियानात मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याने भंडारा तालुक्यातील मुजबी येथे कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, मंडळ अधिकारी विजय हुमणे, आत्माचे सतिश वैरागडे, कृषी सहाय्यक करुणा उराडे, प्रगतशिल शेतकरी देवानंद चौधरी यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकरी देवानंद चौधरी यांनी जिल्ह््््यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी व कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या मागदर्शनात शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरु असलेली वाटचाल याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथीलशेतकरी देवानंद चौधरी, ठाणे जिल्ह्यातील जानकी बागले, औरंगाबाद जिल्ह्यातील दिपक चव्हाण या शेतकºयांशी संवाद साधला.कृषी आयुक्तांकडून भंडारा उपविभागाचे कौतुकजिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जात असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. मात्र आता पारंपारिक शेतकºयांचे अर्थकारण बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे. संपूर्ण विदर्भातून फक्त भंडारा जिल्ह्यातीलच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन ते थेट ग्राहक विक्रीसाठी भंडारा उपविभागातून पाच शेतकरी कंपन्यांचे प्रस्ताव आयुक्तालयात पाठवण्यात आले आहेत. आयुक्तालयाने दखल घेत राज्यस्तरीय बैठकीत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भंडारा उपविभागाचे कौतुक केले आहे. उपविभाग भंडरा उपविभागा अंतर्गत शेतकरी कंपन्यांची बैठक बोलावत ५ शेतकरी कंपन्यांची निवड केली आहे. यात एका गावात एका वाणाची लागवड करुन ग्राहकांना थेट एकाच जातीचा तांदूळ टाटा कंपनीच्या सहकार्याने विक्री होणार आहे. कंपनीशी करार केल्याने बिग बझार व मॉलमध्ये भंडाराचा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. यात दलालाकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पूर्णपणे थांबणार आहे.स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी, शेतमजूरांना देखील प्रशिक्षीत केले जाणार आहे. ज्या नवोदीत तरुणांना,शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीव्यवसासाठीचे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड यांनी केले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी