शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाने घेतली दखल : भंडाराचा तांदूळ मिळणार थेट राज्यभरातील ग्राहकांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतात राबून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकरी देवानंद चौधरी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.विकेल ते पिकेल अभियानात मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याने भंडारा तालुक्यातील मुजबी येथे कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, मंडळ अधिकारी विजय हुमणे, आत्माचे सतिश वैरागडे, कृषी सहाय्यक करुणा उराडे, प्रगतशिल शेतकरी देवानंद चौधरी यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकरी देवानंद चौधरी यांनी जिल्ह््््यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी व कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या मागदर्शनात शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरु असलेली वाटचाल याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथीलशेतकरी देवानंद चौधरी, ठाणे जिल्ह्यातील जानकी बागले, औरंगाबाद जिल्ह्यातील दिपक चव्हाण या शेतकºयांशी संवाद साधला.कृषी आयुक्तांकडून भंडारा उपविभागाचे कौतुकजिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जात असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. मात्र आता पारंपारिक शेतकºयांचे अर्थकारण बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे. संपूर्ण विदर्भातून फक्त भंडारा जिल्ह्यातीलच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन ते थेट ग्राहक विक्रीसाठी भंडारा उपविभागातून पाच शेतकरी कंपन्यांचे प्रस्ताव आयुक्तालयात पाठवण्यात आले आहेत. आयुक्तालयाने दखल घेत राज्यस्तरीय बैठकीत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भंडारा उपविभागाचे कौतुक केले आहे. उपविभाग भंडरा उपविभागा अंतर्गत शेतकरी कंपन्यांची बैठक बोलावत ५ शेतकरी कंपन्यांची निवड केली आहे. यात एका गावात एका वाणाची लागवड करुन ग्राहकांना थेट एकाच जातीचा तांदूळ टाटा कंपनीच्या सहकार्याने विक्री होणार आहे. कंपनीशी करार केल्याने बिग बझार व मॉलमध्ये भंडाराचा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. यात दलालाकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पूर्णपणे थांबणार आहे.स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी, शेतमजूरांना देखील प्रशिक्षीत केले जाणार आहे. ज्या नवोदीत तरुणांना,शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीव्यवसासाठीचे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड यांनी केले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी