शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

लोकप्रतिनिधींच्या वादात खुंटला जिल्ह्याचा विकास!

By admin | Updated: July 17, 2015 00:35 IST

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा प्रमुख जिल्ह्यात भंडारा हे महत्वपूर्ण जिल्हा म्हणून प्रगत व प्रसिद्ध शहर असले, ...

भंडारा : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा प्रमुख जिल्ह्यात भंडारा हे महत्वपूर्ण जिल्हा म्हणून प्रगत व प्रसिद्ध शहर असले, तरी गेल्या काही वर्षांपासून या शहराचा विकास खुंटला आहे. संपूर्ण देशात भंडारा जिल्ह्याला एक वेगळीच ओळख आहे. पूर्वी पितळी उद्योगात भंडारा जिल्हा हा प्रसिद्ध होता. जिल्ह्यातील पवनी तालुका हा देवदर्शनासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात कोका अभयारण्य, राष्ट्रीय गोसेखुर्द धरण, गौतम बुद्धाचे पवित्र स्थान असलेले सिंदपुरी या सर्व गोष्टीमुळे भंडारा जिल्ह्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय पातळीवरचा आलेख उतरल्यामुळे जिल्ह्यासह शहराचाही विकास खुंटला आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या परीने प्रयत्न केलेत. भंडारा जिल्ह्यातून १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा वगळण्यात आला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचे विभाजनाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला १०० टक्के यशही मिळाले. मात्र, त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामाचे जे आश्वासन दिले होते. त्यात ते काही प्रमाणात अपयशी ठरले. गोंदिया जिल्ह्यात अनेक विकास कामे खेचून आणले. विमानतळाची निर्मिती केली. औद्योगिक विकासाची पूर्तीही गोंदियातच करण्यास त्यांनी भर दिला. भंडारा जिल्हा हा भाईजींकरिता महत्वपूर्ण जिल्हा आहे. त्यामुळे त्यांनी मागील लोकसभा निवडणूकीपूर्वी व्हिडीओकॉन कंपनी जिल्ह्यात सुरू करून बेरोजगारांना रोजगारांची संधी देण्याचे आश्?वासन दिले होते. निवडणूक संपली. जिल्ह्यात सत्ताही स्थापन झाली. मात्र, व्हिडीओकॉन कंपनीचा फक्त गोडाऊन भिलेवाडा येथे उभे करण्यात आले. पहाता -पहाता पाच वर्ष लोटले, पुन्हा आश्वासनची खैरात सामान्य नागरिकांना वाटण्यात आली. याउलट काँग्रेस पक्षातून भाजपात गेलेले विद्यमान खा. नाना पटोले हे आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याकडे अधिक भर दिला. मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको असे अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने केलीत. सर्व राजकीय पुढारी आपआपल्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी 'आम्ही हे करणार, ते करणार !' असे आश्वासन देत सत्ता भोगत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' देशभरात निर्माण झाली होती. या लाटेत गोंदिया-भंडारा जिल्हाही अपवाद राहीला नाही. प्रफुल्ल पटेल यांनी 'भेल' कारखान्याला जिल्ह्यातील साकोली जवळ मंजुरी मिळवून दिली. भेलचे काही प्रमाणात कामही करण्यात आले. मात्र, अद्याप कुठल्याही बेरोजगारांची भेलमध्ये वर्णी लागली नाही. मोदी लाटेने यावेळच्या निवडणुकीत नाना पटोले यांना खासदारकी मिळवून दिली. विधानसभा निवडणुकीतही मोदी लाट सोबत होती. जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्र भाजपाने जिंकून झेंडा फडकविला. मात्र, खासदार नाना पटोले यांनी पूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचे जे आश्वासन दिले होते. त्यांची पुर्तता न झाल्याने शेतकऱ्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आपले अस्तित्व जिल्ह्यात असल्याचे सिद्ध करून दाखविले. राष्ट्रवादी व भाजप यांच्या वादात काँग्रेसने बाजी मारली. पण, जिल्ह्याचा विकास मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला नाही. भेल कारखाना सुरू करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधीकडून मिळत असले तरी, हा कारखान कधी सुरू होणार, हे कोणीही सांगू शकत नाही. सर्व पक्षातील नेते फक्त आश्वासन देवून गप्प बसतात. पुर्तता कुणीही करीत नाही. त्यामुळे गोंदिया, नागपूर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. (नगर प्रतिनिधी)