शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर पाऊस होऊनही अप्पर वर्धा केवळ ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथेसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा जमा होत असल्यामुळे अमरावतीकरांना बाराही महिने पाणीटंचाई भासत नाही.

अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या व मोर्शीसह अमरावती शहराची तहान भागवणाऱ्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी  कडक उन्हाळ्याच्या दिवसात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पातळीत कमालीची घट होत असून यावर्षी सुद्धा पाण्याचा जलसाठा अर्ध्यावरच येऊन ठेपला आहे. सध्या सिंभोरा जलाशयात  केवळ ५०.५१ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथेसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा जमा होत असल्यामुळे अमरावतीकरांना बाराही महिने पाणीटंचाई भासत नाही. या धरणातून शेतीसह औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. 

- जानेवारी महिन्यात सिंभोरा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२७ दशलक्ष घनमीटर होती व उपयुक्त जलसाठा ४५७.४९ दलघमी म्हणजे ८१ टक्के जलसाठा होता. परंतु जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत हा जलसाठा जवळपास ३० टक्क्यांनी घटला.

- सध्या धरणातील जलसाठा ३३८.८६ मीटर असून उपयुक्त साठा २८९.३२ दलघमी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणात केवळ ५०.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 

- गेल्या चार महिन्यांत या धरणातून नॉन एरीकेशनकरिता २८.१४३ दलघमी पाणी सोडण्यात आले. गेल्या तीन महिन्यात शहरवासीयांना १३.६७२ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्यात आला. 

- सिंचनाकरिता ११३.५४ एमआयडीसीला ०.६११ आणि रतन इंडिया कंपनीला ६.३४८ दलघमी पाणी पुरविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण