शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

निसर्गाची अवकृपा अन् प्रशासनाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान केंद्रावर आणि शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रांवर धान पोती उघड्यावर। धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव : घाम गाळून धान पिकविला. आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. परंतु गोदाम हाऊसफुल्ल असल्याने दोन महिन्यांपासून तो उघड्यावरच आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शासनाचे दिरंगाईचे धोरण यामुळे पवनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दैनंदिन खर्च आणि मुलामुलींचे लग्नसोहळे कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान केंद्रावर आणि शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आसगाव केंद्रावर २५ हजार ३० क्विंटल, पवनी केंद्रावर १७ हजार ६५२ क्विंटल, खातखेडा केंद्रावर ७१२८ क्विंटल, अड्याळ केंद्रावर १८ हजार २७४ क्विंटल धान खरेदी झाली आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक धान आजही आधारभूत केंद्राच्या बाहेर विक्रीसाठी आहे. धानाने भरलेले पोते उघड्यावर असून त्याला पावसाचा फटका बसत आहे. उंदीर आणि घुशीही पोते कुरतडत आहेत. जुना बारदाना कुचकामी ठरत असून त्यातूनही धान जमिनीवर पडत आहे. अनेक केंद्रावर तर धान पोत्यालगत अंकुर फुटल्याचे दृष्य आहे. शासनाने धान खरेदीचे धोरण ठरविताना योग्य उपाययोजना केल्या असत्या तर शेतकऱ्यांवर ही अवस्थाच आली नसते. धानाची पोती जुनी असल्याने हमालाने पोते उचलल्यावर ते फाटत असल्याचे दृष्य अनेक केंद्रावर दिसते.धानच विकला जात नसल्याने शेतकºयांना आर्थिक विवंचनेचा फटका सहन करावा लागत आहे. अनेकांकडे पीक कर्ज आहे. ते कसे भरावे. दैनंदिन खर्च कसा भागवावा. मुलामुलींच्या लग्नासाठी तजवीज कुठून करावी असे अनेक प्रश्न आहेत.सेवा सोसायट्यांना गोदामाची परवानगी द्याजिल्ह्यातील ग्राम विविध सेवा सहकारी सोसायट्यांना गोदाम बांधण्याची परवानगी दिल्यास धान खरेदीचा प्रश्न सुटू शकतो. शासनाने अनुदान तत्वावर गोदाम उभारण्याची खरी गरज आहे. परंतु आजही भाड्याने गोदाम घेऊन त्यात धान साठविला जातो. त्यामुळे भाड्याचा फटकाही शासनाला सहन करावा लागतो. शासकीय धान खरेदीसाठी सेवा संस्थांना परवानगी द्यावी अशी मागणी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलीक हत्तीमारे यांनी केली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण