शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आंदोलनापूर्वीच मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भारनियमनाने वैतागलेल्या करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी पंपांना १० ते १२ तासाचा वीज पुरवठा करण्यात यावा, रात्रीऐवजी दिवसा पुरवठा करण्यात यावा, बंद मीटर काढून नवीन मीटर बसविण्यात यावे, या तीन मागण्यांसाठी करडी वीज वितरण कार्यालयासमोर रास्ता रोको व मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे पदाधिकारी तथा मुंढरी खुर्दचे सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे व मोहाडी तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनिल सार्वे करणार होते. तसे निवेदनही नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालकांना देण्यात आले होते. आंदोलनाची जय्यत तयारी परिसरातील २५ गावात सुरू होती. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याचा अंदाज येताच प्रशासन पुरते हादरले.अखेर १७ एप्रिल रोजी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना करडी ठाण्यात चर्चेसाठी बोलविण्यात आले. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संजय भुते व शेतकऱ्यांत सविस्तर चर्चा झाली. आठ तास नियमित वीज व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने अखेर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल सार्वे व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी