शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

रेतीच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा खमाटा व टाकळीवासीयांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेतीची अवैध वाहतूक बंद करण्यात यावे, अशा ट्रॅक्टर, ट्रक, जेसीबी चालक मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील खमाटा, टाकळी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा तालुक्यातील खमाटा टाकळी गाव वैनगंगा व सुरनदीच्या मध्यभागी आहे. येथे जुनी टाकळी रेती घाटातून ट्रॅक्टरद्वारे दिवसरात्र २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरनी रेतीचा अवैधरित्या उपसा सुरु आहे. रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. नागरिक भयभीत होऊन जीवन जगत आहे. त्यामुळे येथे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवासह जनावरांचा जीवही सातत्याने होणाऱ्या वाहतुकीने धोक्यात आला आहे. अनेक ट्रक चालक हे शेतकऱ्यांना रस्त्यावरील ट्रक, ट्रॅक्टर बाजूला घे असे हटकले असता अरेरावी करीत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन रेती तस्करांच्या पाठीमागे उभे आहे का? अशी चर्चा गावातून सुरु आहे. जिल्ह्यात रेतीचा अवैध उपसा सुरुच असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. यासंदर्भात योग्य कारवाई करावी अशी मागणी खमाटा टाकळी येथील रहिवासी जयंता आस्वले यांच्यासह गावकºयांनी केली आहे.सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी एकत्र येत भंडारा तहसीलदार, वरठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देवून समस्या मांडली. मात्र याकडे अद्यापही कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांविरुध्द तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात गौरी राघोर्ते, मंजु आस्वले, रेखा ढेंगे, वैशाली गायधने, शालांदर आस्वले, विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, कोठीराम पवणकर, राजकुमार भोपे, योगेश गायधने, धिरण भोपे, जयंता आस्वले आदींचा सहभाग होता.

टॅग्स :sandवाळू