शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

जलविद्युत निर्मिती केंद्राची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 00:36 IST

तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु ...

बावनथडी प्रकल्प : राजापूर वितरिकेचे काम अद्यापही थंडबस्त्याततुमसर : तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी केली आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असताना या प्रकल्पावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाली आहे. असे असले वायू पाणी व जमिनीचे प्रदूषण होणार असून पर्यावरणाच्या समस्याही उद्भवणार असल्याने भविष्यातील संकट लक्षात घेता औष्णिक विद्युत ऐवजी जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात शासनाच्या प्रतिनिधीकडे निवेदन पाठविली. जलविद्युत केंद्रामुळे या भागातील ग्राहकांना नियमित वीज पुरवठा होणार असून नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाची समस्या भेडसावणार नाही. त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. राजापूर वितरिकेचे काम अजूनही थंडबस्त्यातच असल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, राजापूर, सुंदरटोला, सितासावंगी, खंदाळ, गुढरी आदी गावातील शेतकरी बावनथडी प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. जेवढेही कार्य राजापूर वितरीकेचे करण्यात आले त्यात आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., लोभी या गावांचा समावेश आहे. या गावांपर्यंत नहराचे खोदकाम झाले असून त्यातही मोठमोठे भगदाड पडल्याने राजापूर वितरिका पूर्णत: निकामी ठरली. परिणामी परिसरातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना मोबदलाही अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाच्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवून प्रत्यक्षात शासनाच्या नजरेत आणून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचीही मागणी आष्टी जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)