शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जलविद्युत निर्मिती केंद्राची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 00:36 IST

तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु ...

बावनथडी प्रकल्प : राजापूर वितरिकेचे काम अद्यापही थंडबस्त्याततुमसर : तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी केली आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असताना या प्रकल्पावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाली आहे. असे असले वायू पाणी व जमिनीचे प्रदूषण होणार असून पर्यावरणाच्या समस्याही उद्भवणार असल्याने भविष्यातील संकट लक्षात घेता औष्णिक विद्युत ऐवजी जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात शासनाच्या प्रतिनिधीकडे निवेदन पाठविली. जलविद्युत केंद्रामुळे या भागातील ग्राहकांना नियमित वीज पुरवठा होणार असून नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाची समस्या भेडसावणार नाही. त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. राजापूर वितरिकेचे काम अजूनही थंडबस्त्यातच असल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, राजापूर, सुंदरटोला, सितासावंगी, खंदाळ, गुढरी आदी गावातील शेतकरी बावनथडी प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. जेवढेही कार्य राजापूर वितरीकेचे करण्यात आले त्यात आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., लोभी या गावांचा समावेश आहे. या गावांपर्यंत नहराचे खोदकाम झाले असून त्यातही मोठमोठे भगदाड पडल्याने राजापूर वितरिका पूर्णत: निकामी ठरली. परिणामी परिसरातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना मोबदलाही अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाच्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवून प्रत्यक्षात शासनाच्या नजरेत आणून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचीही मागणी आष्टी जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)