शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा चालकांपुढे कुटुंबाचा गाडा ओढण्याचा गहन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

तथागत मेश्राम वरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची ...

तथागत मेश्राम

वरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची खात्री आणि सुनियोजित ठिकाणी पोहचण्याचे उत्तम साधन अशी ओळख आहे. मात्र गतवर्षी कोरोना महासंकट आणि आता इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. अनेकांना आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर २५० परवानाधारक आणि ग्रामीण भागात ५० ऑटोरिक्षा धावतात. कोरोनाच्या काळापासून हा व्यवसाय कुलूपबंद झाला आहे. अशीच अवस्था तालुका आणि जिल्हास्तरावरील ऑटोरिक्षा चालकांची आहे. दिवसभर एका ठिकाणी उभे राहनही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे अनेक ऑटोरिक्षाचालक बसस्थानकाभोवती घिरट्या घालतात. प्रवाशांच्या विणवण्या करतात. परंतु दाद मिळत नाही. आता काही जण रोजंदारीवर तर काही जण बांधकाम कामावर जाताना दिसत आहेत.

दरवाढीचा व्यवसायावर परिणाम झाला काय

कोरोनाने प्रवाशांची वानवा आणि पेट्रोलची दरवाढ घाम फोडणारी आहे. रिकामा ऑटोरिक्षा घेऊन भंडारा रोड रेल्वे स्थानकाबाहेर तासनतास बसूनही प्रवासी मिळत नाहीत. आता अनेक जण भाजीपाला व इतर पर्यायी व्यवसायात जात आहेत. परंतु त्यात जम बसणे सर्वांनाच शक्य नाही.

पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम

n भंडारा रोड रेल्वेस्थानकावर भंडारासाठी जवळपास २५० परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. कोरोना काळापासून व्यवसाय बंद आहेत. प्रवासी रेल्वेगाड्या रोडावल्याने भाडे मिळत नाही. अनेक जण रोजमजुरी करीत आहेत. तर काही जण बांधकाम मजूर म्हणून कामावर जात असल्याचे चित्र आहे.

कोरोना महासंकटातून आता सावरायला लागलो तर पेट्रोलचे दर १०० रुपयावर पोहचले. त्यामुळे भाडे परवडत नाही. सुरुवातीला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला पण आता तोही बंद आहे. प्रवासी मिळत नाहीत. आता काय करावे, असा प्रश्न आहे.

-गुरुदेव बोंद्रे, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. परंतु आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने दिवसभर प्रवासी मिळत नाहीत. शासनाने रिक्षाचा टॅक्स माफ करून आर्थिक मदत द्यावी.

-संजय हटवार, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायावर २० वर्षांपासून कुटुंब चालवत होतो. अचानक व्यवसायावर गंडांतर आले. पेट्रोलचे भाव आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे प्रवासी भाडे परवडत नाही. परंतु पर्याय नसल्याने काहीच करता येत नाही. सकाळपासून रस्त्यावर उभे राहूनही प्रवासी शोधून सापडत नाही. सापडले तर भाव परवडत नाही.

-सरोज रामटेके, ऑटोचालक