शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा चालकांपुढे कुटुंबाचा गाडा ओढण्याचा गहन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

तथागत मेश्राम वरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची ...

तथागत मेश्राम

वरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची खात्री आणि सुनियोजित ठिकाणी पोहचण्याचे उत्तम साधन अशी ओळख आहे. मात्र गतवर्षी कोरोना महासंकट आणि आता इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. अनेकांना आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर २५० परवानाधारक आणि ग्रामीण भागात ५० ऑटोरिक्षा धावतात. कोरोनाच्या काळापासून हा व्यवसाय कुलूपबंद झाला आहे. अशीच अवस्था तालुका आणि जिल्हास्तरावरील ऑटोरिक्षा चालकांची आहे. दिवसभर एका ठिकाणी उभे राहनही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे अनेक ऑटोरिक्षाचालक बसस्थानकाभोवती घिरट्या घालतात. प्रवाशांच्या विणवण्या करतात. परंतु दाद मिळत नाही. आता काही जण रोजंदारीवर तर काही जण बांधकाम कामावर जाताना दिसत आहेत.

दरवाढीचा व्यवसायावर परिणाम झाला काय

कोरोनाने प्रवाशांची वानवा आणि पेट्रोलची दरवाढ घाम फोडणारी आहे. रिकामा ऑटोरिक्षा घेऊन भंडारा रोड रेल्वे स्थानकाबाहेर तासनतास बसूनही प्रवासी मिळत नाहीत. आता अनेक जण भाजीपाला व इतर पर्यायी व्यवसायात जात आहेत. परंतु त्यात जम बसणे सर्वांनाच शक्य नाही.

पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम

n भंडारा रोड रेल्वेस्थानकावर भंडारासाठी जवळपास २५० परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. कोरोना काळापासून व्यवसाय बंद आहेत. प्रवासी रेल्वेगाड्या रोडावल्याने भाडे मिळत नाही. अनेक जण रोजमजुरी करीत आहेत. तर काही जण बांधकाम मजूर म्हणून कामावर जात असल्याचे चित्र आहे.

कोरोना महासंकटातून आता सावरायला लागलो तर पेट्रोलचे दर १०० रुपयावर पोहचले. त्यामुळे भाडे परवडत नाही. सुरुवातीला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला पण आता तोही बंद आहे. प्रवासी मिळत नाहीत. आता काय करावे, असा प्रश्न आहे.

-गुरुदेव बोंद्रे, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. परंतु आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने दिवसभर प्रवासी मिळत नाहीत. शासनाने रिक्षाचा टॅक्स माफ करून आर्थिक मदत द्यावी.

-संजय हटवार, ऑटोचालक

ऑटोरिक्षा व्यवसायावर २० वर्षांपासून कुटुंब चालवत होतो. अचानक व्यवसायावर गंडांतर आले. पेट्रोलचे भाव आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे प्रवासी भाडे परवडत नाही. परंतु पर्याय नसल्याने काहीच करता येत नाही. सकाळपासून रस्त्यावर उभे राहूनही प्रवासी शोधून सापडत नाही. सापडले तर भाव परवडत नाही.

-सरोज रामटेके, ऑटोचालक