शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विजेच्या धक्क्याने चार रानगव्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:09 PM

सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देबांपेवाडा येथील घटना : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची गावांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात चार रानगवे शेताकडे गेली व तिथेच त्यांना आपला प्राण गमवावा लागला. ही घटना बांपेवाडा शेतशिवारात तीन दिवसांपूर्वी घडली. चार रानगव्यांचा विद्युत प्रवाहाच्या धक्याने मृत्यू झाला.बांपेवाडा शिवारालगत नागझिरा अभयारण्य लागून आहे. या जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे जंगलातील तलाव कोरडेच राहिले.परिणामी पाण्याची भीषण समस्या जंगलातही जाणवत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. पांडुरंग चांदेवार रा.बांपेवाडा यांच्या शेतात उन्हाळी धान पिक आहे. मात्र सदर शेतशिवाराला लागूनच जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे जंगली जानवर शेतात येऊन धानाची नासधूस करतात. म्हणून चांदेवार यांनी शेतात विद्युत करंट लावून ठेवले होते. मात्र रात्री अंधारात पाण्याच्या शोधात आलेल्या चार रानगव्यांना शेतातच विद्युत प्रवाहाचा झटका लागला. त्यामुळे घटनास्थळीच चारही रानगव्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी कोळी, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी खोटेले, वनरक्षक गिºहेपुंजे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.त्यांनी चारही रानगव्यांचा पंचनामा करून यात दोन मादी रानगव्यांचा समावेश असून त्यांचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षे आहे. तर दोन रानगव्यांची पिल्ले आहेत. त्यांचे वय अंदाजे ६ महिने ते १ वर्षे असे आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाघाडे यांनी घटनास्थळावरच चारही रानगव्यांचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर या चारही रानगव्यांना जमिनीत पुरण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.