शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-पवनी मार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:09 IST

निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : खड्डे दुरुस्तीनंतरच महामार्ग बांधकामाला सुरुवात करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सिंदपुरी, रुयाळ, पालोरा, कोंढा, अड्याळ, पहेला, दवडीपारी, आंबाडी अशा गावातील महामार्गावर बºयाच ठिकाणी खड्डे तर काही अंतर संपूर्ण खडतर आहे. याआधी या खड्ड्यांमध्ये मुरुम घालुन खड्डे सपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रासही झाला होता. त्यानंतर पहेला येथे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.कारधा टोल नाका ते अड्याळ आणि त्यापुढे नवीन रस्ता बनणार आहे. परंतु याच महामार्गावरील मोठमोठे खड्डे जर सपाट झाले तर तेवढाच आधार वाहनचालकांना व प्रवाशांना होऊ शकतो. ज्या ठिकाणी अधिकाधिक खड्डे आहेत ते भरल्या गेले नाही आणि जेव्हा मुरुमाने खड्डे भरल्या गेले होते, तेव्हा तेही जास्त काळ दिवस टिकाव धरु शकले नाही. परिणामत: वाहनचालक आणि धारक तसेच प्रवासी या मार्गाने जाताना मात्र मनात धास्ती करुन जाताना दिसतात.सध्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी यामुळे थोडा कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु कमीत कमी प्रमाणात त्रास होणार याचीही काळजी संबंधित विभाग तसेच अधिकाºयांची नाही का, असा प्रश्न आहे. दर महिन्याला या महामार्गावर एक ना एक अपघात होताना दिसतो. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. वेळोवेळी धूळ होणार नाही, प्रवाशांना तसेच वाहनचालकांनाही याचा त्रास होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी सध्या जोमात सुरु आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.