शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लाखांदूर तालुक्यात ६१६.०३ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:36 IST

Bhandara : लाखांदूर तालुका प्रशासनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ७ जुलै ते १० जुलैच्या सुमारास तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामांतर्गत लागवडीखालील शेकडो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी शासनाकडून क्षतिग्रस्त पिकांचे पंचनाम्याचे निर्देश निर्गमित झाले होते.

या निर्देशानुसार स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील सिंचित व असिंचित भाग मिळून एकूण ६६१६,०३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर येथील तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.

स्थानिक लाखांदूर तालुक्यातील विविध भागांत दरवर्षी खरीप हंगामाच्या सुमारास विविध सिंचन सुविधांतर्गत हजारो हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड केली जाते, तर तालुक्यातील कमीत कमी असिंचित भागात आवत्या धान पिकाची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील सिंचन सुविधाधारक शेतकऱ्यांनी काही हेक्टर क्षेत्रात धान पिकाची रोवणी पूर्ण केली होती, तर असिंचित भागातील शेतकऱ्यांनी काही हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड झाली होती.

पूर परिस्थितीचे पाणी शेत शिवारात गेल्याने शेतातील लागवडीखालील पिके पाण्याखाली आल्याने धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. प्रकरणी शासनाकडून क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश निर्गमित झाले होते. या निर्देशानुसार लाखांदूर तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पुढाकारात क्षतीग्रस्त धान पिकाचे पंचनामे करण्याचे कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे

तालुक्यातील सिंचन सुविधाधारक १ हजार ११० शेतकऱ्यांचे ६०४.८७ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, तालुक्यातील केवळ २६ शेतकऱ्यांचे ११.१६ हेक्टर असिंचित क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

असिंचित क्षेत्रासाठी ८ हजार ५०० रुपये नुकसानभरपाईराज्य शासनाकडून सन २०२३ च्या निर्देशानुसार असिंचीत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ८५०० रुपये नुकसानभरपाई ची योजना आखण्यात आली आहे, तर सिंचित क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रति हेक्टर १७ हजार रुपये नुकसानभरपाईचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यानुसार सात जुलै ते १० जुलै व्या सुमारास तालुक्यातील असिंचित क्षेत्रातील क्षतीग्रस्त २६ शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ८५०० रुपये नुकसान भरपाई, तर सिंचित क्षेत्रातील क्षतिग्रस्त १११० शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध भागांत दरवर्षी खरीप हंगामाच्या

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती