शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा झाला तरी दोषी सापडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:34 IST

भंडारा अग्निकांडाला शनिवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेदिवशीच भंडाऱ्यात येऊन उच्चस्तरीय समितीची घोषणा केली.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाचे खरे कारण शोधण्यासाठी नियुक्त  केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने आठवडा उलटल्यावरही आपला अहवाल सादर केलेला नाही. तो नेमका कधी सादर होणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे प्रशासनाला घटनेतील दोषी सापडेनासे झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. 

भंडारा अग्निकांडाला शनिवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेदिवशीच भंडाऱ्यात येऊन उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. तीन दिवसात ही समिती अहवाल देईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. समितीच्या अध्यक्षाची उचलबांगडी करून विभागीय आयुक्त संजीवकुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तेव्हा दोन-तीन दिवसातच दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप या समितीचा अहवाल सादर झाला नाही. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारपर्यंत समिती अहवाल देईल, असे सांगितले. त्यामुळे सर्वांच्या नजरा अहवालाकडे लागल्या आहेत.  भंडारा पोलीस ठाण्यात तूर्तास दहा बालकांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर पोलीस कारवाईची दिशा निश्चित होईल. अहवाल येत नाही तोपर्यंत ही घटना आणि घटनेला कोण जबाबदार आहे, हे कळायला मार्ग नाही.

समितीकडून प्रात्यक्षिकासह चौकशीn चौकशी समितीने १२ जानेवारी रोजी दिवसभर तळ ठोकून कसून चौकशी केली. अग्निशमन कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, गार्ड यांच्याकडून या घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. n या पथकात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामास्वामी एम., महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांगडाले, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे तसेच आरोग्य सेवा उपसंचालक संजय जयस्वाल यांचा समावेश होता.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगCrime Newsगुन्हेगारी