शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

पीक करपले अन् कुंकू हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत.

ठळक मुद्दे३२२ प्रकरणे अपात्र : जिल्ह्यात १८ वर्षात ५७४ शेतकरी आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे, मात्र गत दोन दशकांत सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी फक्त २४६ शेतकऱ्यांना निकषांमध्ये पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२० या कोरोना संकट काळात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी अजूनपर्यंत एकाही कुटुंबाला मदत मिळालेली नाही. जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत. या सहापैकी अजूनही कुणालाच मदत मिळालेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने हलाखीच्या परिस्थितीत सदर कुटुंब वास्तव्यास आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे महिन्याभरातच बाप-लेकाचा मृत्यू झाला. आता घरात फक्त सुन आणि सासू  आहेत. नियतीचा हा काळा घाला असह्य वेदना देणारा ठरला. साकोली तालुक्यातील कुंभली येथे भेंडारकर कुटुंबियाची अवस्था बिकट आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आज अत्यंत हालाखीच जीवन जगत आहेत. त्या आधाराची गरज आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांची आपबिती

सव्वा महिना झाला, पती गेले. अजुनही मदत मिळाली नाही. मजुरीचे काम करून प्रपंच सुरू आहे. लहान मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. नियतीने सर्वस्व हिरावले आता करावे काय. - काजल भेंडाराकर, कुंभली

पतीने आत्महत्या केल्यानंतर शासन व लाेकप्रतिनिधींकडून जी मदत मिळावयास हवी हती, ती मिळाली नाही. मोलमजुरी व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.- कमला शेंडे, कोसरा,ता.पवनी

महिन्याभरात माझे धनी आणि पोटचा गोळा काळाने हिरावला.  सासू व मी दोघेच आहोत. काय करावे अन्‌ काय नाही, सुचत नाही. पाणावलेल्या डो्ळ्यांनी मदतीची अपेक्षा करूनही आता उपयोग काय? वेळीच मदत मिळाली असती तर आज माझे कुंकु शाबूत असते. आर्थिक टंचाइने होत्याचे नव्हते केले.-जिजाबाई चुटे, विरली, बु. (ता. लाखांदूर) 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या