शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

पीक करपले अन् कुंकू हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत.

ठळक मुद्दे३२२ प्रकरणे अपात्र : जिल्ह्यात १८ वर्षात ५७४ शेतकरी आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे, मात्र गत दोन दशकांत सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी फक्त २४६ शेतकऱ्यांना निकषांमध्ये पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२० या कोरोना संकट काळात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी अजूनपर्यंत एकाही कुटुंबाला मदत मिळालेली नाही. जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत. या सहापैकी अजूनही कुणालाच मदत मिळालेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने हलाखीच्या परिस्थितीत सदर कुटुंब वास्तव्यास आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे महिन्याभरातच बाप-लेकाचा मृत्यू झाला. आता घरात फक्त सुन आणि सासू  आहेत. नियतीचा हा काळा घाला असह्य वेदना देणारा ठरला. साकोली तालुक्यातील कुंभली येथे भेंडारकर कुटुंबियाची अवस्था बिकट आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आज अत्यंत हालाखीच जीवन जगत आहेत. त्या आधाराची गरज आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांची आपबिती

सव्वा महिना झाला, पती गेले. अजुनही मदत मिळाली नाही. मजुरीचे काम करून प्रपंच सुरू आहे. लहान मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. नियतीने सर्वस्व हिरावले आता करावे काय. - काजल भेंडाराकर, कुंभली

पतीने आत्महत्या केल्यानंतर शासन व लाेकप्रतिनिधींकडून जी मदत मिळावयास हवी हती, ती मिळाली नाही. मोलमजुरी व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.- कमला शेंडे, कोसरा,ता.पवनी

महिन्याभरात माझे धनी आणि पोटचा गोळा काळाने हिरावला.  सासू व मी दोघेच आहोत. काय करावे अन्‌ काय नाही, सुचत नाही. पाणावलेल्या डो्ळ्यांनी मदतीची अपेक्षा करूनही आता उपयोग काय? वेळीच मदत मिळाली असती तर आज माझे कुंकु शाबूत असते. आर्थिक टंचाइने होत्याचे नव्हते केले.-जिजाबाई चुटे, विरली, बु. (ता. लाखांदूर) 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या