शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 13:37 IST

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत

विरली (भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसानभरपाई मिळाली. मदतीच्या नावाखाली केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. मोठे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. त्याने गुरुवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.

लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील जयपाल प्रकाश भांडारकर, असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव आहे. ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत. त्यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली.

महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. मदतीच्या यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले. रक्कम खात्यात जमा झाली. किती? तर केवळ १ हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. त्यांनी मिळालेली मदत शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला व लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

भांडारकर यांची ही भूमिका सध्या सध्या चर्चेचा विषय झाली आहे. भांंडारकरशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे.

शेतात लावलेल्या ०.४० हेक्टरमधील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णत: नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे मी ती परत केली.

- जयपाल प्रकाश भांडारकर

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbhandara-acभंडाराEknath Shindeएकनाथ शिंदे