शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 13:37 IST

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत

विरली (भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसानभरपाई मिळाली. मदतीच्या नावाखाली केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. मोठे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. त्याने गुरुवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.

लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील जयपाल प्रकाश भांडारकर, असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव आहे. ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत. त्यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली.

महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. मदतीच्या यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले. रक्कम खात्यात जमा झाली. किती? तर केवळ १ हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. त्यांनी मिळालेली मदत शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला व लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

भांडारकर यांची ही भूमिका सध्या सध्या चर्चेचा विषय झाली आहे. भांंडारकरशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे.

शेतात लावलेल्या ०.४० हेक्टरमधील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णत: नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे मी ती परत केली.

- जयपाल प्रकाश भांडारकर

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbhandara-acभंडाराEknath Shindeएकनाथ शिंदे