शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

०७ लोक १३ के पालांदूर : गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ...

०७ लोक १३ के

पालांदूर : गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रगतीचा मूलमंत्र ‘ग्रामगीते’तून आपल्याला दिलेला आहे. गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. तेव्हा तरुणांनो शहराकडे धाव न घेता आपल्याच गावात तंत्रज्ञानाचा आधार घेत रोजगार तयार करा. एकमेकाला सहकार्य करीत गावाला समृद्ध बनवा, अशी मार्मिक विचारांची पेरणी राष्ट्रसंत तुकडोजींच्या ग्रामगीतेचा आधार घेत पालांदूरवासीयांना भागवत सप्ताहातून हभप जगदीश्वर बांगरे महाराज पळसगाव (कोलारी) यांनी प्रबोधन केले.

महाराज म्हणाले, घराघरातून राष्ट्रसंतांची शिकवण कलयुगात तारक ठरलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी यांनी तुम्हा-आम्हाकरिता सोप्या भाषेत ग्रामगीता लिहिलेली आहे. तिचे वाचन प्रत्येकांनी करीत गावाला समृद्ध करण्याकरिता प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित सांगितलेले आहे. निर्व्यसनी राहत दिव्य आयुष्य जगण्याची कला ग्रामगीता तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक तरुणाने मातापित्यांची सेवा करीत कुटुंबाला सक्षम करण्याकरिता गावातच उद्योगशील बनावे. आपल्या काळ्या मातीतच समृद्धी आणीत आपलं गाव प्रगतिपथावर नेण्याकरिता तरुणांनी पुढाकार घ्यावा. सुसंस्कृत कुटुंब, गाव, देश घडविण्याकडे कल असावा. उपाशी व्यक्तीला अन्न, तहानलेल्याला पाणी, भरकटलेला रस्ता दाखवीत आयुष्यात एकमेकाला सहकार्य करावे. यातच खरा ईश्वर असल्याचे राष्ट्रसंतांनी सांगितलेले आहे. प्रत्येकाने राष्ट्रसंतांची वाणी खरी ठरविण्याकरिता प्रामाणिक तेने प्रयत्नशील असावे, असे आवाहन बांगरे महाराज यांनी केले.

चौकट

बांगरे महाराज यांनी सातही दिवस सकाळी अर्धा तास रामधून निघण्यापूर्वी गावकऱ्यांना ग्रामगीतेचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे. ग्रामगीतेतील तुकडोजींच्या विचारांची पेरणी करीत भागवत सप्ताहाला तुकडोजीमय केले आहे. आधुनिक काळातही ग्रामगीतेचे महत्त्व अबाधित आहे. गाव हा देशाच्या नकाशावरील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.