शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

०७ लोक १३ के पालांदूर : गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ...

०७ लोक १३ के

पालांदूर : गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रगतीचा मूलमंत्र ‘ग्रामगीते’तून आपल्याला दिलेला आहे. गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. तेव्हा तरुणांनो शहराकडे धाव न घेता आपल्याच गावात तंत्रज्ञानाचा आधार घेत रोजगार तयार करा. एकमेकाला सहकार्य करीत गावाला समृद्ध बनवा, अशी मार्मिक विचारांची पेरणी राष्ट्रसंत तुकडोजींच्या ग्रामगीतेचा आधार घेत पालांदूरवासीयांना भागवत सप्ताहातून हभप जगदीश्वर बांगरे महाराज पळसगाव (कोलारी) यांनी प्रबोधन केले.

महाराज म्हणाले, घराघरातून राष्ट्रसंतांची शिकवण कलयुगात तारक ठरलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी यांनी तुम्हा-आम्हाकरिता सोप्या भाषेत ग्रामगीता लिहिलेली आहे. तिचे वाचन प्रत्येकांनी करीत गावाला समृद्ध करण्याकरिता प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित सांगितलेले आहे. निर्व्यसनी राहत दिव्य आयुष्य जगण्याची कला ग्रामगीता तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक तरुणाने मातापित्यांची सेवा करीत कुटुंबाला सक्षम करण्याकरिता गावातच उद्योगशील बनावे. आपल्या काळ्या मातीतच समृद्धी आणीत आपलं गाव प्रगतिपथावर नेण्याकरिता तरुणांनी पुढाकार घ्यावा. सुसंस्कृत कुटुंब, गाव, देश घडविण्याकडे कल असावा. उपाशी व्यक्तीला अन्न, तहानलेल्याला पाणी, भरकटलेला रस्ता दाखवीत आयुष्यात एकमेकाला सहकार्य करावे. यातच खरा ईश्वर असल्याचे राष्ट्रसंतांनी सांगितलेले आहे. प्रत्येकाने राष्ट्रसंतांची वाणी खरी ठरविण्याकरिता प्रामाणिक तेने प्रयत्नशील असावे, असे आवाहन बांगरे महाराज यांनी केले.

चौकट

बांगरे महाराज यांनी सातही दिवस सकाळी अर्धा तास रामधून निघण्यापूर्वी गावकऱ्यांना ग्रामगीतेचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे. ग्रामगीतेतील तुकडोजींच्या विचारांची पेरणी करीत भागवत सप्ताहाला तुकडोजीमय केले आहे. आधुनिक काळातही ग्रामगीतेचे महत्त्व अबाधित आहे. गाव हा देशाच्या नकाशावरील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.