शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

कोरोना प्रतिबंधासाठी लग्न पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

मांढळ येथील घटना लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित ...

मांढळ येथील घटना

लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित झाल्याने उभय कुटुंबीयांकडून लग्नसमारंभासाठी आवश्यक साहित्याची खरेदी व लग्नपत्रिका काढून त्यांचे वितरण आप्तेष्टांसह मित्रपरिवारातदेखील करण्यात आले. मात्र, तालुक्यात अचानक कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने या विषाणूच्या संभाव्य संसर्गाची खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित झालेले लग्न कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. हे लग्न दोन्ही नव वर-वधू परिवारांकडून पुढे ढकलण्यात आल्याने जनतेत या दोन्ही परिवारांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. या समाजाला प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारा निर्णय तालुक्यातील मांढळ गावात घेण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मांढळ गावातील एका नववधूचे आंतरतालुक्यातील एका नव वरासोबत लग्न पक्के करण्यात आले. लग्न पक्के होताच लग्नाची तारीखदेखील निश्चित करण्यात आली. या तारखेनुसार हे दोन्ही नव वर-वधू ११ एप्रिल रोजी सामाजिक रितीरिवाजानुसार विवाह बंधनात अडकणार होते. हे लग्न नववधूच्या राहत्या घरी पार पाडले जाणार होते.

दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना तालुक्यातील तीन गावे कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधितदेखील करण्यात आली. या संबंध परिस्थितीची दखल घेत ग्रामीण भागातील मांढळ गावात लग्न समारंभासाठी होणारी गर्दी व त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची सूचना केली.

या सूचनेनुसार नववधूकडील परिवाराने नव वराच्या परिवाराकडे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासंबंधाने सकारात्मक चर्चा केली. त्यानुसार वर-वधू परिवारांच्या संमतीने लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावर नियमित निर्देश व प्रतिबंधात्मक उपययोजना निर्गमित केल्या जात असताना बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून निष्काळजी व हलगर्जीपणा होऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहेत. मात्र, लग्नसंबंधामधून दोन भिन्न गोत्रांची खूणगाठ बांधणारा लग्नसोहळा कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याने दोन्ही नव वर-वधू परिवारांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरल्याचे बोलले जात आहे.