शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

कोरोना प्रतिबंधासाठी लग्न पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

मांढळ येथील घटना लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित ...

मांढळ येथील घटना

लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित झाल्याने उभय कुटुंबीयांकडून लग्नसमारंभासाठी आवश्यक साहित्याची खरेदी व लग्नपत्रिका काढून त्यांचे वितरण आप्तेष्टांसह मित्रपरिवारातदेखील करण्यात आले. मात्र, तालुक्यात अचानक कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने या विषाणूच्या संभाव्य संसर्गाची खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित झालेले लग्न कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. हे लग्न दोन्ही नव वर-वधू परिवारांकडून पुढे ढकलण्यात आल्याने जनतेत या दोन्ही परिवारांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. या समाजाला प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारा निर्णय तालुक्यातील मांढळ गावात घेण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मांढळ गावातील एका नववधूचे आंतरतालुक्यातील एका नव वरासोबत लग्न पक्के करण्यात आले. लग्न पक्के होताच लग्नाची तारीखदेखील निश्चित करण्यात आली. या तारखेनुसार हे दोन्ही नव वर-वधू ११ एप्रिल रोजी सामाजिक रितीरिवाजानुसार विवाह बंधनात अडकणार होते. हे लग्न नववधूच्या राहत्या घरी पार पाडले जाणार होते.

दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना तालुक्यातील तीन गावे कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधितदेखील करण्यात आली. या संबंध परिस्थितीची दखल घेत ग्रामीण भागातील मांढळ गावात लग्न समारंभासाठी होणारी गर्दी व त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची सूचना केली.

या सूचनेनुसार नववधूकडील परिवाराने नव वराच्या परिवाराकडे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासंबंधाने सकारात्मक चर्चा केली. त्यानुसार वर-वधू परिवारांच्या संमतीने लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावर नियमित निर्देश व प्रतिबंधात्मक उपययोजना निर्गमित केल्या जात असताना बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून निष्काळजी व हलगर्जीपणा होऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहेत. मात्र, लग्नसंबंधामधून दोन भिन्न गोत्रांची खूणगाठ बांधणारा लग्नसोहळा कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याने दोन्ही नव वर-वधू परिवारांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरल्याचे बोलले जात आहे.