शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे अर्धशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने मृत्यूची संख्याही वाढत आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ३५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.

ठळक मुद्देमृतांची संख्या पोहचली ५१ वर । सर्वाधिक ३५ मृत्यू भंडारा तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीला कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात आता रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५१ व्यक्ततींचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच मृत्यूचा आकडा वाढला आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने मृत्यूची संख्याही वाढत आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ३५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. तर तुमसर आणि मोहाडी तालुक्यात प्रत्येकी सहा, पवनी तालुक्यात दोन आणि लाखनी व साकोली तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.शनिवारी जिल्ह्यात ९४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ६६ व्यक्तींचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत १३३९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. साकोली, लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तुमसर आठ, मोहाडी सहा, पवनी तीन, लाखनी सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विविध उपाययोजनेंतही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे.अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीडद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत २०७६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १८ हजार १९३ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात आली आहे. अगदी कमी वेळात कोरोना रुग्णासंदर्भात या टेस्टद्वारे माहिती मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ४६२ व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी १५३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत १४०० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात १२४७ रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात सर्वेक्षणाचे कामही केले जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू