तंटामुक्तीसाठी समन्वय महत्त्वाचा

By Admin | Updated: May 20, 2014 23:26 IST2014-05-20T23:26:56+5:302014-05-20T23:26:56+5:30

गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे.

Coordination for conflict is important | तंटामुक्तीसाठी समन्वय महत्त्वाचा

तंटामुक्तीसाठी समन्वय महत्त्वाचा

भंडारा : गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे. आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घ्यावी. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गावभेटी दौर्‍याचे वेळी तंटामुक्त गाव समित्यांना पुरेपुर मार्गदर्शन करून तंटे मिळविण्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. मालमत्ता आणि शरीर संबंधातील गुन्हेगारीवर आळा बसेल यादृष्टीने ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी चोखपणे कार्य करीत राहावे. गावपातळी वरील समितीमध्ये सर्व प्रकारचे सदस्यांचा समावेश असल्याने सर्वांनी व्यवस्थित कर्तव्य बजावल्यास मोहिमेला निश्चितच गती येऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावपातळीवर छोट्याछोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होवू नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होवू नये कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, यादृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून समारोपचारोन आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याचे व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात अंर्तभूत होणार ७ तालुके १५ पोलीस स्टेशन व त्यामधील ५४२ ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायतीनी मोहिमेत सहभाग घेतला होता. गावपातळीवर पोलीस ठाणे पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करून गावपातळीवर समितीमध्ये समाजात ज्याचा प्रभाव आहे अशा प्रतिष्ठीत, प्रामाणिक, समजुतदार आणि निस्वार्थी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. तंटामुक्त गाव समितीमध्ये पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी व पोलीस बिट अंमलदार यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यानी मोहिम सुरू झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायती तंटामुक्त होवून भंडारा जिल्हा तंटामुक्त जिल्हा झाला आहे. जिल्ह्यात १२ कोटी १७ लक्ष ५० हजार रूपयेचे बक्षीस मिळालेले आहे. अजुनही २२ ग्रामपंचायतींना शासनाकडून पुरस्काराची रक्कम मिळावयास आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Coordination for conflict is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.