काँग्रेसच्या आनंदोत्सवाला पोलिसांचा मज्जाव

By Admin | Updated: June 26, 2017 00:25 IST2017-06-26T00:25:31+5:302017-06-26T00:25:31+5:30

स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला.

Conviction of Congratulations to the Congress | काँग्रेसच्या आनंदोत्सवाला पोलिसांचा मज्जाव

काँग्रेसच्या आनंदोत्सवाला पोलिसांचा मज्जाव

प्रकरण कर्जमुक्तीचे : आतषबाजी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला. यात विजयोत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी काँग्रेसने या प्रकाराला लोकशाही मुल्यांची अध:पतन असे म्हटले आहे.
दुसरीकडे विजयोत्सव साजरा करणारच अशी भूमिका काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येऊन तनावपूर्ण परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी होती, असेही त्यांनी ठासून सांगितले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर गणवीर म्हणाले, काँग्रेस पक्षाने सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला होता. सरकारने १ लाख ५० हजार रूपयांच्या मयार्देत कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे, शेतक-यांना १० हजार रुपए मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना लाभापासून वंचित ठेवू नये, अशीही मागणी आहे.
यावेळी महेंद्र निंबार्ते, धनराज साठवणे, सचिन घनमारे, अनु.जाती. जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, प्रशांत देशकर, माजी नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नगरसेविका जयश्री बोरकर, आशा तिवाडे, सुषमा वरगंटीवार, गणेश निमजे, हिरामण लांजेवार, शेख नबाब, जनार्धन निंबार्ते, प्रा मारबते, प्रशांत सरोजकर, विनीत देशपांडे, रवीकुमार येरखेडे, नाहीद परवेज आदी उपस्थित होते.

Web Title: Conviction of Congratulations to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.