शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:00 AM

राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तर काहींचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. साधारणत: महिन्याला ५० ते ६० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना लॉकडाऊनपूर्वी दरमहा ५५० ते ६०० रुपये बील येत होते.

ठळक मुद्देअव्वाच्या सव्वा बिल : बिल भरल्यास महिनाभर घर चालवायचे कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात सरासरी वीज बील पाठविणाऱ्या वीज वितरणने आता ग्राहकांना पाठविलेले बील पाहून डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. महिन्याला साधारणत: ५०० ते ७०० रुपये बील येणाऱ्यांच्या हातात तीन महिन्याचे थेट तीन ते साडेतीन हजाराचे बिल पडले आहेत. वीज बिल भरल्यास महिन्याभर घर चालवायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वीज वितरणकडे याबाबत विचारणा केली तर नियमाप्रमाणे वीज बिल बरोबर असल्याचे सांगत ‘गणित’ही करुन दाखवित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहक आता मोठ्या अडचणीत सापडले.राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तर काहींचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. साधारणत: महिन्याला ५० ते ६० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना लॉकडाऊनपूर्वी दरमहा ५५० ते ६०० रुपये बील येत होते. मात्र आता हेच बील ग्राहकांना तीन ते साडेतीन हजार रुपये आले आहे. १५०० ते १६०० बील येणाऱ्या ग्राहकाला दुप्पट बील आले आहे. अनेक ग्राहकांना तर तीप्पट व चौपट बील आले आहे. सरासरी आलेल्या बीलाची रक्कम भरली असली तरी ती रक्कम या वीज बिलातून कमी करण्यात आली नाही, अशा अनेक तक्रारी आहेत.दुसरीकडे वीज वितरण कंपनीने विद्युत बिल एकंदरीत कुठल्या आधारावर पाठविले याबाबत माहिती देणारे अ‍ॅपच सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपवर ग्राहक क्रमांक घातल्यावर मीटर रिडींगसह देयकाची पुर्ण माहिती येते. मात्र यातील किंबहुना माहिती ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आता वीज बिल भरावे की, घर चालवावे अशा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.विदर्भ राज्य समिती : सर्व ग्राहकांचे वीज बिल माफ करालॉकडाऊन काळात ग्रामीण व नागरी भागात गरीब व सामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले. हाताला काम नसल्याने मजुरीविना अनेक कुटूंबाचे हाल झाले. लॉकडाऊन शिथिल होवून काही दिवस लोटले असतानाच वीज वितरण कंपनीने अवाजवी बिल पाठविले. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान गरीब गरजू व सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्यासाठी शासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा अन्यथा विदर्भ राज्य समितीने आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लाखांदूर तालुक्यात चार उपकेंद्राअंतर्गत २५ हजार पेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. त्यात ४०० उद्योजक व सात हजार कृषी पंपधारकांचा समावेश आहे. अवाजवी वीज बिलाने संबंध ग्राहकांमध्ये धडकी भरली आहे.देयकांच्या संदेशाने वाढतोय मनस्तापकोरोना पार्श्वभूमीवर ग्राहकांना दुप्पट, तिप्पट वीज देयक पाठविले जात आहे. काही ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरुनही सावकारी पध्दतीने ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविणे सुरु केले आहे. परिणामी ग्राहकांचा मनस्ताप वाढला असून संताप व्यक्त होत आहे. घरगुती युनीटमागे सरासरीच बील पाठविल्याने देयकाच आकडा फुगला आहे. तीन महिन्याचे युनीट एकत्र करुन ११.७१ रुपये या प्रती युनिट दराने बील पाठविण्यात आले आहे. तसेच मीटर भाडे सुध्दा १० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. स्थिर आकार, वहन आकार व वीज शुल्क ही १६ टक्के व व्याज आकारणी कंपनीकडून केली आहे. काही ठिकाणी ग्राहकांनी टप्याटप्याने वीज बील भरण्याची मागणीही केली आहे.लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना मिळालेल्या घरगुती वीजेचे बिल माफ होईपर्यंत नागरिकांनी आर्थिक असहयोग आंदोलन केले पाहिजे. वीज बिल वसुली व पुरवठा खंडित करणाऱ्यांचा मज्जाव करावा, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.- राम येवले,संयोजक, विदर्भ राज्य समिती

टॅग्स :electricityवीज