शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शेतकरी विरोधी कृषी व कामगार काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

१०० पेक्षा जास्त दिवस लोटले तरी केंद्र सरकारला जाग आलेली नाही. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड ...

१०० पेक्षा जास्त दिवस लोटले तरी केंद्र सरकारला जाग आलेली नाही. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रूपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रूपयांवर झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. म्हणून तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पुकारला. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पवनी शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक पवनी येथे सकाळी ११ ते दु. ४ वाजता पर्यंत उपोषण करण्यात आले .

उपोषणाला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत,अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर तेलमासरे, मनोहर उरकुडकर, आनंद वाहने, प्रकाश भोंगे, अवनती राऊत, डॉ. विकास बावनकुळे, विजय रायपूरकर, नगरसेवक गोपाल नंदरधने, धर्मेंद्र नंदरधने, हंसा खोब्रागडे, महेश नान्हे, अक्षत नंदरधने, नरेंद्र बिलावणे, लीनेश सेलोकर, जयपाल नंदागवळी, शशिकांत भोंगे, किशोर भोयर, रमेश पंचभाई, योगेंद्र टेंभूर्णे, आशिष रायपूरकर, जया भाजीपाले, नंदा सुतारे आणि पवनी तालुक्यातील व शहरातील कॉंग्रेस कमिटी, सेवादल ,युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय.इंटक, असंघटीत कामगार संघटन, अल्पसंख्यांक विभाग, अनुसुचीत जाती विभाग, किसान सेल, ओबीसी सेल व इतर सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला उपस्थित होते.