शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

संघर्ष माणसाला जगण्याचे बळ देतोे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले. लाखनी येथील द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा वनवे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक संजय वनवे, आशिष बडगे, प्रशांत वाघाये उपस्थित होते.

ठळक मुद्देतुषार उमाळे : लाखनी येथील लिटील फ्लावर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : माणसाच्या जीवनात आलेला संघर्ष माणसाला जगण्याचे बळ देते. त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आपली असली पाहिजे. जगातील अनेक यशस्वी लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले.लाखनी येथील द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा वनवे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक संजय वनवे, आशिष बडगे, प्रशांत वाघाये उपस्थित होते.प्रा. तुषार उमाळे म्हणाले, विद्यार्थी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर विद्यार्थी जीवनात मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात तुमचं ध्येय ठरवा, जोपर्यंत आपलं ध्येय ठरवलं नसनार तोपर्यन्त आपल्या प्रवासाला दिशा नसेल म्हणून ध्येय ठरवून मोठी स्वप्न बघा आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवन्यासाठी प्रामाणिक झोकुन देऊन प्रयत्न करा, एक दिवस तुम्ही नक्की यशाला गवसणी घातलेली असेल.आज सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र इतिहासात काहीही साधनं उपलब्ध नसलेल्या अनेक लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष करून स्वत:ला सिद्ध केलं आणि जगाने त्यांची दखल घेतली. आपण अशा व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्य उज्वल होण्याच्या दृष्टीने प्रवास करायला पाहिजे.मुख्याध्यापिका आशा वनवे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपली पकड त्या त्या विषयावर बसवली पाहिजे. सर्व महापुरुषांच्या जीवन प्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या आपल्या जीवनात आपण अमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशांत वाघाये यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची उपयुक्तता सांगितली.संचालन सामिग्रा वनवे, तर आभार प्रदर्शन वैभव उपासे यांनी केले. कार्यक्रमासाठी वर्षा पंचबुद्धे, याह्या आकबानी, मिनाक्षी डोरले, प्रिया ठाकरे, पुष्पा मानकर, प्रतिक्षा बंसोड, स्वाती ढेंगे, छाया बावनकुळे, पूजा गोतमारे, कृष्णा उइके, फातिमा शेख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा