शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळयात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। भंडारा येथे मान्सून पूर्वतयारी आढावा, रस्ते व पुलाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट भागातील गावातील लोकांना संभाव्य धोक्याची जाणीव करुन देण्यासोबतच पूल व रस्त्यांचे दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी आटोपावे. जलसंपदा विभागाने पूर निवारण यंत्रणा तसेच विद्युत व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळयात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. या कामासाठी निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मॉकड्रिल व कर्मचाऱ्याना प्रशिक्षणाचे आयोजन एका दिवशी दोन तालुके या प्रमाणे तात्काळ करावे. होमगार्ड व नाविकांची यादी तयार करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राहत शिबिराचे नियोजन करावे. सर्व तहसीलदारांनी ग्रामदक्षता समितीची सभा घेवून पुरपरिस्थितीबाबत चर्चा करावी व ग्रामस्थांना अवगत करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना दरमहा पाच किलो तांदुळ व कुटूंबास एक किलो चना देण्याचे १९ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार देय आहे. उद्योग, कामगार, पोलीस, नगर परिषद व पंचायतीच्या प्रतिनिधींनी लाभार्थ्यांची यादी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे सादर करुन त्यासाठी केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.आतापासून तयारी व मॉकड्रिलचे आयोजन करुन नदीकाठावरील पुरबाधित गावावर लक्ष केंद्रीत करा. कोणतीही अनुचित घटना घडून वित्त व मनुष्यहानी होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुरामुळे दुषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागाने निर्जंतुकीकरण व्यवस्था तयार ठेवावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्सून पूर्वतयारी बाबत प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी सादरीकरणाद्वारे आपल्या विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी जलसंपदा, तहसिल, नगरपालिका, नगरपचायत, बांधकाम विभाग, आरोग्य, पोलीस, विद्युत विभाग, राज्य परिवहन विभाग, गोसीखुर्द प्रकल्प, पुरवठा विभाग, आदी विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच टोळधाड जनजागृती बाबत कृषी विभागाद्वारे माहिती देण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक