शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मोहाडी तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू करण्याची नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:29 IST

Bhandara : रोजगाराअभावी पलायन, कामानुसार दामाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा, देव्हाडा परीसरातील गावांमध्ये अद्यापही रोजगार हमीची कामे सुरू झालेली नाहीत. रोहयो कायद्यानुसार मागेल त्याला काम, कामानुसार दाम आणि शंभर दिवस कामाची हमी शासनाने दिली आहे. पण, तालुक्यात रोहयोची कामे सुरू झालेली नसल्याने मजुरांचे पलायन वाढले आहेत. रोहयो कामे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. याच कालावधीत रब्बी हंगाम संपून शेतशिवार मोकळे होतात. मे महिन्यात शेत मजुरांसाठी पर्याप्त शेतीची काम नसतात. सध्या एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असताना रोजगार हमीचे काम सुरू झालेले नाहीत. मार्च महिन्यातच रोजगार हमीचे कामे सुरू होणे आवश्यक होती.

नाला सरळीकरण, तलावास द्यावे प्राधान्यनाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, पांदण रस्ता माती काम, भातखचरे आदी कामांना प्रशासनाने प्राधान्य दिल्यास मोठ्या संख्येने मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळते. शिवाय कामेही एक ते दोन महिने चालतात. त्यासाठी प्रशासनाने मोठी कामे कशी उपलब्ध होतील, त्यादृष्टीने नियोजन करावे. यामुळे मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होवून उदरनिर्वाह चालेल.

मजूर म्हणतात, १०० दिवसांची हमी केव्हा ?मजुरांना रोजगार मिळत नसल्याने कामाच्या शोधात मजुरांचे पलायन होत आहेत. त्यामुळे गाव, खेडे ओस पडत आहेत. परंतु, रोहयो कामांअभावी मजुरांनी करायचे तरी काय, असा मोठा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने रोहयो कायद्यानुसार १०० दिवसांची हमी दिली असली तरी, कामे केव्हा सुरू होणार, असाही प्रश्न आहे.

मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अकुशल कामांचे अधिकाधिक नियोजन करणे हिताचे ठरणार आहे. परंतु, अधिकाऱ्यांचे केवळ कुशल कामांकडे अधिक लक्ष दिसून येते. अकुशल कामातून कमाई होत नाही, त्यामुळे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येते. 

महागाईमुळे मजूर व शेतकरी चिंतेतशेतातील अत्यल्प उत्पादन व महागाईमुळे मजुरांसह शेतकरी चिंतेत आहेत. अशावेळी रोहयो कामांचा आधार मोठा आर्थिक हातभार लावणार आहे. परंतु, अनेकदा संबंधित रोजगार सेवक व अभियंत्याकडून चेहरा पाहून मजुरी दिली जाते, अशी ओरड मजुरांची असते. प्रशासनाने यासंबंधी लक्ष घालून कामानुसार दाम देण्याची खात्री करावी, तशा सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. कामाअभावी मजुरांना तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना घरखर्च चालविताना कमालीची अडचण निर्माण होत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराUnemploymentबेरोजगारी