साथीच्या आजाराने नागरिक बेजार
By Admin | Updated: August 11, 2014 23:44 IST2014-08-11T23:44:55+5:302014-08-11T23:44:55+5:30
कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक उन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

साथीच्या आजाराने नागरिक बेजार
भंडारा : कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक उन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत अतिसार, हगवण, मलेरिया, थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजाराने आबाल-वृद्ध त्रस्त झाले आहेत.
पावसाचे अपेक्षित प्रमाण नसल्याने वातावरणात दमट हवामान निर्माण होवूनआरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसत आहे. भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. एकंदरीत तालुक्यात साथरोगाने थैमान घातले असताना प्रशसन मात्र सुस्तावले आहे. प ्रशसकीय स्तरावर कोणतीही बैठक घेण्यात आली नाही, आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. आजवर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात अनेक रुग्णालय असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत.
सध्या चांगला पाऊस बरसल्याने पिण्याच्या पाण्यातील दोष यामुळे शहरासह तालुक्यात अनेकांना आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात साथीच्या आजारात मोडल्या जाणाऱ्या ताप, सर्दी आदी आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुकाभर अधून मधून रिमझिम पाऊस त्यात सतत पावसाचे होणारे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी आरोग्य विभाग मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)