शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत संतापाची लाट

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने धान उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. रासायनिक खतासाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचाही मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.एकीकडे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही. धान विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. विकलेल्या धानाचे पैसेही मिळत नाही. हाती आलेले पैसे मेहनतीच्या मानाने अतीशय तुटपुंजे असते. त्यातच डिझेल आणि खतांची दरवाढ शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारी ठरु शकते. पुर्वी शेतकरी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु अलिकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करतात. खताची मात्रा दिली नाही तर शेतातुन अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. 

महागाईची हद्द झालीडिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतीशी निगडित बहुतांश कामे आता ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साह्याने केली जात आहे. मात्र दरवाढ झाल्याने शेतकरी आता परंपरागत पद्धतीने मशागत करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

ट्रॅक्टरच्या मशागतीचा ८०० रुपये तासइंधनाच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरचे मशागतीचे दर प्रति तास ६०० रुपये होते. परंतु आता ८०० रुपये प्रति तास झाले आहेत. एका एकराला नागरटीपासून ते चिखलणीपर्यंत साडेतीन तास ट्रॅक्टर हवा असतो. पूर्वी २१०० रुपये एकरी खर्च यायचा. परंतु तो आता २८०० पर्यंत पोहोचला आहे. शेतकरी आता परंपरागत पद्धतीने बैलाच्या साहाय्याने मशागत करावी काय, अशा विचारात दिसत आहे.

खताच्या किमती वाढल्याने आमचे गणित बिघडणार आहे. आधीच लागवड खर्चही निघत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि किडनीचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादक अडचणीत आले आहेत. खताच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.-ललीराम खंडाईत, दिघोरी (मोठी)

भंडारा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. धान पिकाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. परंतु आता २०० ते २५० रुपये दरवाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडणार आहे. शासनाने खताचे दर तरी नियंत्रणात ठेवावे.-नामदेव आंबेडारे, पारडी

डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्चही वाढत आहे. शेतीचा दिवसेंदिवस खर्च वाढत असताना आता सर्वत्र महागाई दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला तीच किंमत मिळत आहे. यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय झाला आहे.-माधवराव झोडे,  मुर्झा

धानासह सर्वच पिकाला रासायनिक खताची गरज असते. शेतकरी रासायनिक खत विकत घेतात. मात्र अलिकडे वाढत्या किमतीने रासायनिक खत विकत घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण जाईल. त्याचा परिणाम उत्पन्नावर होईल.-विष्णूदास हटवार, चिखली

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र