शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

गतवर्षाच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढले रासायनिक खत

By युवराज गोमास | Updated: May 13, 2024 15:59 IST

Bhandara : जिल्ह्यातील शेतकरी बेजार, उत्पादन व खर्चाचा हिशेब जुळेना

भंडारा : खरीप हंगामाला प्रारंभ होताच रासायनिक खतांच्या किमती साधारणत: ५० ते १०० रूपयांनी वाढल्या आहेत. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे आधीच हतबल असलेला शेतकरी पुन्हा बेजार आहे. शेतीसाठी लागणारा खर्च व उत्पन्न यांच्या हिशेबाचा ताळमेळ जुळत नसल्याची ओरड वाढीस लागली आहे.

गत दहा वर्षांत रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. परंतु, कृषी उत्पादनांच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर ताण आला आहे. युरिया वगळता काही रासायनिक खतांच्या किमती ५० ते १०० रूपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांसाठी हंगामात एकरी २० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यातच हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलाचा मार सुद्धा सहन करावा लागतो आहे.यंदा रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मनमानी पद्धतीने किमती वाढविल्या असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. किमती वाढविताना शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन क्षमतेचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी मिळणारे उत्पादन व होणारा खर्च आता परवडणारा राहिलेला नाही. मिळणाऱ्या उत्पन्नात लागवडीचा खर्चही भागताना दिसत नाही. यामुळे शेती कसायची तरी कशी, उत्पन्नातून कर्ज फेडायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

सध्याचे व गतवर्षातील प्रति बॅग खताचे दर

खते                                  सध्याचे दर                   गतवर्षातील दर२०-२०-०१३                          १४००                             १३००सिंगल सुपर फाॅस्फेट            ६००                               ६००डीएपी.                                 १३५०                            १३५०८-२१-२१                              १८००                            १७५०सफला १५-१५-१५                १४७०                           १४००२४-२४-००                           १७००                            १५००१०-२६-२६                           १४७०                           १४७०युरिया                                   २६६                               २६६

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणऐन पेरणीच्या हंगामात खतांच्या किमती वाढल्या आहेत. तर धान लागवडीवेळी खतांचा कृत्रीम तुटवडा करून किमती आणखी वाढविल्या जातात. त्यामुळे शेतकरी अधिक खर्चाच्या ओझ्याखाली दाबल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. शासन-प्रशासनाने खताच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अनावश्यक लिंकिंगचा भार हटवाकृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना मुख्य खतासोबतच लिकिंगची खते खरेदी करण्याची सक्ती केली जाते. याबाबत अनेकदा, बैठका व चर्चा होऊनही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून खाजगी खत कंपन्या बिनदिक्कतपणे लिंकिंगचे खत माथी मारत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालून लिंकिंगची अनावश्यक सक्ती हटलेली नाही. शासनाने याकडे गांर्भीयाने लक्ष घालण्याची गरज आहे.

टॅग्स :Fertilizerखतेbhandara-acभंडारा