शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

गतवर्षाच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढले रासायनिक खत

By युवराज गोमास | Updated: May 13, 2024 15:59 IST

Bhandara : जिल्ह्यातील शेतकरी बेजार, उत्पादन व खर्चाचा हिशेब जुळेना

भंडारा : खरीप हंगामाला प्रारंभ होताच रासायनिक खतांच्या किमती साधारणत: ५० ते १०० रूपयांनी वाढल्या आहेत. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे आधीच हतबल असलेला शेतकरी पुन्हा बेजार आहे. शेतीसाठी लागणारा खर्च व उत्पन्न यांच्या हिशेबाचा ताळमेळ जुळत नसल्याची ओरड वाढीस लागली आहे.

गत दहा वर्षांत रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. परंतु, कृषी उत्पादनांच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर ताण आला आहे. युरिया वगळता काही रासायनिक खतांच्या किमती ५० ते १०० रूपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांसाठी हंगामात एकरी २० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यातच हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलाचा मार सुद्धा सहन करावा लागतो आहे.यंदा रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मनमानी पद्धतीने किमती वाढविल्या असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. किमती वाढविताना शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन क्षमतेचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी मिळणारे उत्पादन व होणारा खर्च आता परवडणारा राहिलेला नाही. मिळणाऱ्या उत्पन्नात लागवडीचा खर्चही भागताना दिसत नाही. यामुळे शेती कसायची तरी कशी, उत्पन्नातून कर्ज फेडायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

सध्याचे व गतवर्षातील प्रति बॅग खताचे दर

खते                                  सध्याचे दर                   गतवर्षातील दर२०-२०-०१३                          १४००                             १३००सिंगल सुपर फाॅस्फेट            ६००                               ६००डीएपी.                                 १३५०                            १३५०८-२१-२१                              १८००                            १७५०सफला १५-१५-१५                १४७०                           १४००२४-२४-००                           १७००                            १५००१०-२६-२६                           १४७०                           १४७०युरिया                                   २६६                               २६६

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणऐन पेरणीच्या हंगामात खतांच्या किमती वाढल्या आहेत. तर धान लागवडीवेळी खतांचा कृत्रीम तुटवडा करून किमती आणखी वाढविल्या जातात. त्यामुळे शेतकरी अधिक खर्चाच्या ओझ्याखाली दाबल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. शासन-प्रशासनाने खताच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अनावश्यक लिंकिंगचा भार हटवाकृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना मुख्य खतासोबतच लिकिंगची खते खरेदी करण्याची सक्ती केली जाते. याबाबत अनेकदा, बैठका व चर्चा होऊनही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून खाजगी खत कंपन्या बिनदिक्कतपणे लिंकिंगचे खत माथी मारत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालून लिंकिंगची अनावश्यक सक्ती हटलेली नाही. शासनाने याकडे गांर्भीयाने लक्ष घालण्याची गरज आहे.

टॅग्स :Fertilizerखतेbhandara-acभंडारा