शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

‘चांदपूर इको टुरिझम’ ठरले दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ पासून या पर्यटन विकास मंदावला आणि पर्यटन स्थळ भकास बनू लागले.

ठळक मुद्देगत दोन वर्षापासून शासकीय प्रस्ताव धूळ खात, लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकीकडे शासन पर्यटनस्थळ विकासाबाबत कटीबद्ध असल्याचे सांगत असले तरी गत पाच वर्षापासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तालुक्यातील चांदपूर ला इको टुरिझम बनविण्याचे केवळ दिवास्वप्नच ठरले असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ पासून या पर्यटन विकास मंदावला आणि पर्यटन स्थळ भकास बनू लागले. तेव्हापासूनची ओरड परिसरातील जनता व पर्यटक करीत होते.दरम्यान गत दोन तीन वर्षाअगोदर शासनाने इको टुरिझम अंतर्गत चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली व भंडारा जिल्ह्यातील एकमेव इको टुरिझम म्हणून या स्थळाला मंजुरीही देण्यात आली. त्यानुसार जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) भंडाराकडून २३ मार्च २०१७ ला पर्यटनस्थळाचे सर्वेक्षण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र तो प्रस्ताव अजूनही शासनदप्तरी धूळ खात आहे.पर्यटनस्थळी आणधीच सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची तसेच भाविकांची वाढ होवून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. परिणामी इको टुरिझम अंतर्गत पर्यटनस्थळ विकास होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.डीएफओ भंडारा यांच्या कार्यालयामार्फत २३ मार्च २०१७ ला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रस्ताव पाठविला गेला आहे. मी नव्यानेच रूजू झाल्याने त्यापुढे प्रस्तावाचे काय झाले याची माहिती नाही.-जी.एफ. लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास