शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

रेती तस्करांसह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा आहे. मात्र अलीकडे रेती तस्करीतून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. राजकीय आश्रयातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असली तरी या तस्करांपुढे महसूल पथक निष्प्रभ ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनाच वेळोवेळी कारवाईसाठी पुढे यावे लागते.

ठळक मुद्देनवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला : अवैध दारु, जुगारअड्डे, जनावरांची तस्करी झाली डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शांतता प्रिय म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अलिकडे रेती तस्करीसह गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. अवैध दारु, जुगार अड्डे, जनावरांची तस्करी यासह सक्रिय गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नव नियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या पुढे आहे. थेट मुंबईवरुन आलेल्या वसंत जाधव यांनी भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती असून ते गुन्हेगारीचा बिमोड करतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.राज्यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले. भंडाराचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी मुंबई शहर शिघ्र कृती दलाचे पोलीस आयुक्त वसंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा आहे. मात्र अलीकडे रेती तस्करीतून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. राजकीय आश्रयातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असली तरी या तस्करांपुढे महसूल पथक निष्प्रभ ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनाच वेळोवेळी कारवाईसाठी पुढे यावे लागते. अनेकदा रेती तस्कर पोलिसांवर हल्ले चढवितात. अशा या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे. या सोबतच जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जाते. यासोबतच गावागावात हातभट्टीची दारु गाळली जात असून जुगाराचे अड्डेही सुरु आहे. वरुन सर्व आॅलवेल दाखविण्याचा प्रयत्न असला तरी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत.चोरीच्या घटनातही वाढ झाल्याचे अलीकडे दिसत आहे. या सर्वांना अंकूश आणण्यासाठी नवीन पोलीस अधीक्षक कोणती रणनिती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नवीन एसपींना जिल्ह्याची खडान्खडा माहितीजिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती आहे. सहा वर्षांपूर्वी ते भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात त्यांनी गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. आता अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शांतताप्रिय नागरिकांना नवीन पोलीस अधीक्षकांकडून आहे.

टॅग्स :Policeपोलिसsandवाळू