शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

देखणी पर्यटनस्थळे शापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:57 IST

निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेल्या वैनगंगेसह देखणी पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे जिल्ह्याला राष्ट्रीय नकाशावर झळकू शकतात. गोसेखुर्द प्रकल्प, कोका अभयारण्य, रावणवाडी, चांदपूर इको पर्यटन, आंबागड- पांगळी जलाशय, नागझिरा अभयारण्य यासह गौंड राजाच्या संपन्न वारसा सांगणारे किल्ले आहेत. वैनगंगेचे विशाल पात्र जलपर्यटनासाठी आदर्श आहे. परंतू पर्यटन स्थळांची सद्याची असलेली अवस्था पर्यटकांच्या मनस्तापात भर घालणारी आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने निर्सगाचा हा अनमोल खजाना शापित ठरत आहे.

ठळक मुद्देइच्छाशक्तीचा अभाव : निर्सगाने दिले पण प्रशासनाने गमावले

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेल्या वैनगंगेसह देखणी पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे जिल्ह्याला राष्ट्रीय नकाशावर झळकू शकतात. गोसेखुर्द प्रकल्प, कोका अभयारण्य, रावणवाडी, चांदपूर इको पर्यटन, आंबागड- पांगळी जलाशय, नागझिरा अभयारण्य यासह गौंड राजाच्या संपन्न वारसा सांगणारे किल्ले आहेत. वैनगंगेचे विशाल पात्र जलपर्यटनासाठी आदर्श आहे. परंतू पर्यटन स्थळांची सद्याची असलेली अवस्था पर्यटकांच्या मनस्तापात भर घालणारी आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने निर्सगाचा हा अनमोल खजाना शापित ठरत आहे.पितळ आणि तलावासाठी प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा धान पिकासाठीही ओळखला जातो. सात तालुक्यांचा विस्तार असलेला हा जिल्हा म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल. भाताची हिरवीगार शेते, घनदाट जंगल आणि बारमाही वाहनारी वैनगंगा या जिल्ह्याच्या समृद्धीत भर घालणारी आहे. सात तालुक्याच्या विस्तार असलेला हा जिल्हा पर्यटनासाठी आदर्श आहे. जिल्ह्याच्या मध्यभागातून गेलेला राष्टÑीय महामार्ग, मुंबई हावडा लोहमार्ग आणि ८० किलोमीटर असंतरावर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ जगभरातील पर्यटकांना खेचून आणण्यास समर्थ आहेत.भंडारा शहरातून वैनगंगा वाहते. गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये शहरालगतचा परिसर येतो. या ठिकाणी संथ आणि अथांग पाण्याचा उपयोग पर्यटनासाठी होऊ शकतो. हा परिसर ‘बीओटी’ तत्वावर विकसित केला जाऊ शकतो. वॉटर स्पोर्ट, जलसफारी अशा विविध उपक्रमातून येथे चांगले पर्यटनस्थळ विकसित करात येवू शकते. वैनगंगा नदीच्या भरोश्यावर राज्य व राष्टÑीय स्तरावरील नौकानयन सारख्या स्पर्धांचेही आयोजन केले जाऊ शकते. यासाठी मोठ्या निधीची गरज नाही. केवळ गरज आहे ती इच्छा शक्तीची.तुमसर, पवनी व साकोली तालुक्यातील किल्ले इतिहासाची साक्ष देत आहेत. पूर्व विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पवनीत पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे विकासाला मारक ठरत आहे. पर्यटन व तीर्थस्थळांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध अभयारण्य व नव्याने घोषित करण्यात आलेल्या कोका वन्यजीव अभयारण्य, नागझीरा, अंबागड किल्ला, नृसिंह टेकडी माडगी, कोरंभी (भंडारा), रावणवाडी जलाशय, चकारा (अड्याळ), लाखा पाटलाची पहाडी, आंभोरा, दुर्गाबाई डोह गढकुंभली, शंकर महादेव नेरला देवस्थान, सोनी नदी संगम, गिरोला पहाडी, भृशुंड गणेश मंदिर, गोसावी मठ, गुढरी जलाशय, मांगलीबांध परिसर, उत्तरवाहिनी श्रीक्षेत्र मांढळ, चारभट्टी (पुयार), सिंदपुरी (रूयाळ), शिव-पर्वताची गुफा (धुटेरा-तुमसर), हनुमंत देवस्थान खोडगाव (मोहाडी), गायमुख देवस्थान, सानगडी येथील सहानगढ किल्ला, पवनी येथील किल्ला, गोसीखुर्द धरण परिसर, भंडारातील पांडे महाल, खांबतलाव, तुमसर तालुक्यातील पांगळी जलाशय परिसर यासह अनेक पर्यटनस्थळ व तिर्थस्थळे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आंबागड येथे राजा बख्तबुलंदशहा द्वारे निर्मित कलात्मक व सुंदर वास्तुशिल्प निर्मित किल्ल्याचे दोन वर्षांपुर्वी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली आहे.असा हा निसर्गाचा अनमोल खजना मात्र सध्या दुर्लक्षित आहे.पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत राज्य शासन उदासीन आहे. ग्रीन हेरीटेज या पर्यावरणवादी संस्थेने अनेक उपक्रमातून राज्य शासनाकडे संबंधित पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत पाठपुरावा केला आहे. उपेक्षित पर्यटन, प्राचीन वास्तूंचे विकास व जतन करण्याकरिता मुबलक निधी मंजूर करून त्यांचा भरीव विकास, अद्यावत विश्रामगृहे, होम स्टे यासह पर्यटक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन सूचना केंद्र शासनाने सुरू करावे.-मो.सईद शेख,अध्यक्ष ग्रीन हेरिटेज संस्था, भंडारा.