शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

मतदार यादीची अट रद्द करा

By admin | Updated: May 6, 2017 00:25 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पाच्या भंडारा व नागपूर जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटींचे .....

प्रकल्पग्रस्तांची मागणी : शासनाच्या मोबदल्यापासून ग्रामस्थ वंचितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पाच्या भंडारा व नागपूर जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज १८ जून २०१३ च्या शासन निर्णयाने मंजूर करण्यात आले. मात्र, यासाठी प्रकल्पग्रस्तांचे नाव मतदार यादीत असने गरजेचे आहे. यादीत नाव नसल्यास प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित राहणार असल्याने ही अट रद्द करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.या पॅकेजचे वाटप करण्यासाठी निवाडा हा मुख्य घटक. कुटूंब प्रमुखांना नोकरी ऐवजी एकर कमी मोबदला दोन लाख नव्वद हजार रूपये देण्यात आला. काही प्रकरणात राहत्या घराची विभागणी झाली नसल्याने एकापेक्षा अधिक कुटुंबाची गणना एक कुटूंब म्हणून करण्यात आले. परंतु त्याची गणना एक कुटूंब म्हणून करण्यात आली आहे. अशा कुटूंबाना वाढीव कुटूंब म्हणून वाढीव मोबदला देण्याचे शासनाच्या विचाराधिन होता. त्यामुळे वाढीव कुटूंबाना नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम देण्यासाठी ८ आॅगस्ट २०१५ ला आदेश निर्गमीत केले. परंतू आदेशात १९९७ च्या मतदार यादीत वाढीव कुटूंबाचे नाव असावे तसेच वाढीव कुटूंबाचे वास्तव्य गावात असल्याचा पुरावा सादर करावा अशा प्रकार अनेक जाचक अटी असल्याने प्रकल्पग्रस्त कुटूंब प्रमुखांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेपासून वंचित राहावे लागले. परंतु शासनाच्या कोणत्याही आदेशात १९९७ च्या मतदार यादीत नाव कुटंूब प्रमुखासह इतराचे असावे असा उल्लेख नाही आहे. मग भंडारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी व जिल्हधिकारी भंडारा यांनी १९९७ च्या मतदार यादीत कुटूंब प्रमुखाचे नाव असावे असी जाचक अट का घातली हा एक संसोधनाचा विषय आहे. काही कुटूंब परिवारासह पोटाची खळगी भरण्यासाठी तसेच कामाच्या शोधात इतरत्र गेलेत परंतु त्यांचे मुळ कुटूंब त्याच गावात वास्तव्य करीत होते. वाढीव कुटुंबांना एकमुस्त रकमेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव व सादर करतेवेळी १९९७ च्या मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे ही अट वगळता कुटूंबप्रमुख गावात असल्याचा पुरावा सादर करू शकतात. जिल्हाधिकारी भंडारा यांनी १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे ही जाचक अट रद्द करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी केली आहे.