शिबिरार्थ्यांनी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे
By Admin | Updated: January 14, 2016 00:47 IST2016-01-14T00:47:03+5:302016-01-14T00:47:03+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या शिबिरार्थ्यांनी काम करताना संताचे विचार जोपासावे व जनसेवा ही ईश्वरसेवा समजून ग्रामीण भागात काम करावे,

शिबिरार्थ्यांनी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे
रासेयो शिबिर : विनायक बुरडे यांचे प्रतिपादन
खराशी : राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या शिबिरार्थ्यांनी काम करताना संताचे विचार जोपासावे व जनसेवा ही ईश्वरसेवा समजून ग्रामीण भागात काम करावे, असे आवाहन येथील बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केले. ते जेवनाळा येथे संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर यांच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय रासेयो शिबिरात बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृंदा करंजेकर, लाखनी पंचायत समितीचे उपसभापती विजय कापसे, सरपंच वैशाली बुरडे, उपसरपंच दिलीप घटके, पालकृष्ण उपरीकर, पोलीस पाटील विना सेलोकर, वाय.एस. टिचकुले, रमेश लुटे, संतोष गिऱ्हेपुंजे, वनिता सेलोकर, मुख्याध्यापक निर्वाण, अनिल गोंदोळे, डॉ. राजेंद्र खंडाईत, प्रा. निंबेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्या डॉ. करंजेकर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या हातात देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांने आदर्श जीवन जगावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उपयोग करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कार्याचे परीक्षण करून त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक शिबिरार्थी व गावकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यासपीठावरून व्यक्त केल्या.
विद्यापीठस्तरीय शिबिराच्या समारोपाप्रसंगी जेवनाळा येथील ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजयकुमार निंबेकर यांनी सुत्रसंचालन सुधन्वा चेटुले तर आभार डॉ. राजेंद्र खंडाईत यांनी केले.
कार्यक्रमासाठी डॉ. रवी पाठेकर, प्रा. शेंडे, प्रा. नितीन थुल, प्रा. रमेश बागडे, प्रा. गिरीश लांजेवार, बाळकृष्ण मेश्राम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)